शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; शांततेला सुरूंग

By admin | Updated: December 5, 2014 23:59 IST

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद.

अजय डांगे/ अकोला राज्यातील शांततेला सुरुंग लागला असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१२ मध्ये खून, प्राणघातक हल्ला, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, दंगल, बलात्कार यासारखे गुन्हे २६ हजार ६५0 घडले होते. याच गुन्ह्यांची नोंद सन २0१३ मध्ये ३२ हजार ५५२ एवढी झाली. हिंसा ही समाजाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी बाब आहे. हिंसेच्या घटना घडल्यास सातत्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. त्याचा परिणाम विकासावरही होतो. सन २0१२ मध्ये जनजीवनावर परिणाम करणार्‍या गंभीर गुन्ह्यांची संख्या ६ हजार ९६३, तर २0१३ मध्ये ८ हजार १0३ होती. सन २0१२ मध्ये सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविणारे गुन्हे ७ हजार ७४२ , तर २0१३मध्ये १0 हजार ६७९ गुन्हे घडले. सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणार्‍या दोन गटात मारहाणीसारख्या गुन्ह्यांत सन २0१२च्या तुलनेने २0१३मध्ये घट झाली आहे. २0१२मध्ये सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणारे १0 हजार १0६ गुन्हे तर २0१३मध्ये १0 हजार ८0७ गुन्हे नोंदविण्यात आले. अमरावती विभागात यवतमाळ अव्वल..सन २0१३मध्ये अमरावती विभागात सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले. सन २0१३मध्ये विभागात खून-२५६, प्राणघातक हल्ला-२८४, बलात्कार-३१0, अपहरण-२५३, लुटमार-३४८ आणि दरोड्याचे ५१ गुन्हे नोंदविण्यात आले. जिल्हा           खून            खुनाचा प्रयत्न            बलात्कार          अपहरण       दरोडा            लुटमारअकोला          ३५                 ४७                            ४६                    ३१             १७                ७९अमरावती     ५५                   ६0                             ७८                   ५३         0५                 ४८बुलडाणा        ५४                  ४३                           ५६                     २१           0८                 ४१यवतमाळ      ८५                  ९१                          १0४                    १२४          १९               १४९वाशिम          २७                   ४३                           २६                     २४          0२                 ३१*पोलिस आयुक्तालयांचीही स्थिती गंभीरचऔरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात या गुन्ह्यांमध्ये १२.२२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.