शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; शांततेला सुरूंग

By admin | Updated: December 5, 2014 23:59 IST

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद.

अजय डांगे/ अकोला राज्यातील शांततेला सुरुंग लागला असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१२ मध्ये खून, प्राणघातक हल्ला, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, दंगल, बलात्कार यासारखे गुन्हे २६ हजार ६५0 घडले होते. याच गुन्ह्यांची नोंद सन २0१३ मध्ये ३२ हजार ५५२ एवढी झाली. हिंसा ही समाजाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी बाब आहे. हिंसेच्या घटना घडल्यास सातत्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. त्याचा परिणाम विकासावरही होतो. सन २0१२ मध्ये जनजीवनावर परिणाम करणार्‍या गंभीर गुन्ह्यांची संख्या ६ हजार ९६३, तर २0१३ मध्ये ८ हजार १0३ होती. सन २0१२ मध्ये सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविणारे गुन्हे ७ हजार ७४२ , तर २0१३मध्ये १0 हजार ६७९ गुन्हे घडले. सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणार्‍या दोन गटात मारहाणीसारख्या गुन्ह्यांत सन २0१२च्या तुलनेने २0१३मध्ये घट झाली आहे. २0१२मध्ये सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणारे १0 हजार १0६ गुन्हे तर २0१३मध्ये १0 हजार ८0७ गुन्हे नोंदविण्यात आले. अमरावती विभागात यवतमाळ अव्वल..सन २0१३मध्ये अमरावती विभागात सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले. सन २0१३मध्ये विभागात खून-२५६, प्राणघातक हल्ला-२८४, बलात्कार-३१0, अपहरण-२५३, लुटमार-३४८ आणि दरोड्याचे ५१ गुन्हे नोंदविण्यात आले. जिल्हा           खून            खुनाचा प्रयत्न            बलात्कार          अपहरण       दरोडा            लुटमारअकोला          ३५                 ४७                            ४६                    ३१             १७                ७९अमरावती     ५५                   ६0                             ७८                   ५३         0५                 ४८बुलडाणा        ५४                  ४३                           ५६                     २१           0८                 ४१यवतमाळ      ८५                  ९१                          १0४                    १२४          १९               १४९वाशिम          २७                   ४३                           २६                     २४          0२                 ३१*पोलिस आयुक्तालयांचीही स्थिती गंभीरचऔरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात या गुन्ह्यांमध्ये १२.२२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.