शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

विदर्भात रब्बी पीक वाढविण्यावर भर!

By admin | Updated: October 5, 2014 23:39 IST

अकोला येथील विभागीय संशोधन, विस्तार सल्लागार सभेत तज्ज्ञांनी घेतला आढावा.

अकोला : विदर्भातील रब्बी पिकांचे क्षेत्र कसे वाढविता येईल, या विषयावर ५६ व्या विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार सभेत तज्ज्ञांनी आढावा घेतला. रब्बीचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य ते भाव ठरले पाहिजे, यावर यावेळी मंथन करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर. ठाकरे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. सभेला कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, डॉ.सी.एन. गांगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भातील दुबार पिकांखालील क्षेत्र वाढविण्याची नितांत गरज असून, कृषी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान, शिफारशी शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत नेण्याची खरी जबाबदारी कृषी विभाग व शास्त्रज्ञांची असल्याचे आवाहन कुलगुरू दाणी यांनी यावेळी केले. शेतात घाम गाळून पिके काढणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शेतमालाला आधारभूत किंमत मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी कृषी विद्यापीठाने तशा शिफारशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. इंगोले यांनी खरीप हंगाम लांबल्याने रब्बी हंगामालादेखील विलंब होत असल्याचे सांगितले. त्यामुळे कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यादृष्टीने रब्बी हंगामाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सरदार यांनी तेलबिया पिके वाढीवर भर देतानाच पश्‍चिम विदर्भातील इतर रब्बी पिकांचे क्षेत्र वाढविण्यावरही भर दिला. यावर्षी आठ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आहे; परंतु हे क्षेत्र १२ लाखांच्यावर नेण्याची गरज असल्याने विभागातील कृषी अधिकार्‍यांनी त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पावसाचा प्रत्येक थेंब मुलस्थानी जिरविला तरच रब्बी हंगामात त्याचा लाभ होत असल्याने कृषी अधिकार्‍यांनी गावोगाव शेतकर्‍यांशी संपर्क ठेवून त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन सरदार यांनी केले.