शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ

By admin | Updated: May 29, 2014 23:24 IST

प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि प्लास्टिकचे ग्लासचा अत्याधिक वापर होत आहे.

पातूर : लग्नकार्यासाठी लागणार्‍या वस्तूची विल्हेवाट लागत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास सर्रास वापरण्यात येतात; परंतु हजारोच्या संख्येंनी असलेले हे ग्लास रस्त्यावर फेकून देण्यात येत असल्यामुळे प्रदूषण वाढीस हातभार लागत आहे. लग्न सराईत ग्रामीण भागात एकाच दिवसी अनेक लग्न सोहळे असतात. या लग्न सोहळ्यात जेवणासाठी प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि पाणी पिण्याकरिता डिस्पोजलचा अत्याधिक वापर होत आहे. जेवणाची पंगत उठल्यानंतर या पत्रावळी आणि डिस्पोजल परिसरात अस्ताव्यस्त टाकण्यात येत असतात. त्यावर उष्टे अन्नही असते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. मंगल कार्यालयाच्या बाहेर या पत्रावळी, द्रोण, डिस्पोजल वाट्या फेकून दिलेल्या असतात. मात्र मंगल कार्यालयाचे संचालक किंवा वर-वधूकडील मंडळी या पत्रावळी, डिस्पोजलची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुगंर्धी निर्माण होते. पूर्वीच्या काळात पळस अथवा मोहाच्या पानाच्या पत्रावळी सर्वत्र राहत होत्या. आता त्याची जागा प्लास्टिकपासून निर्मित पत्रावळींनी घेतली आहे. या पत्रावळी प्लास्टिकच्या असल्याने जमिनीत गाडल्या तरी कुजत नाहीत. त्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होत असतो. यासाठी प्लास्टिक पत्रावळी, डिस्पोजलची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या कामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे.