शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

रेल्वे क्वाॅर्टर परिसरात पाेलीस गस्त वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

जिल्हा कचेरीत नियम पायदळी अकाेला : काेराेनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ...

जिल्हा कचेरीत नियम पायदळी

अकाेला : काेराेनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसह खुद्द काही अधिकारी व कर्मचारी काेराेना नियम पायदळी तुडवित असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी हाेत आहे.

जिल्हा परिषदेत स्वच्छतागृहाचा अभाव

अकाेला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात प्रलंबित कामे निकाली काढण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागातील नागरिक दाखल हाेतात. यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश राहताे. जिल्हा परिषदेच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबणा हाेत आहे. या विषयाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

माेकाट कुत्र्यांचा बंदाेबस्त करा!

अकाेला : शहरात माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा सुळसुळाट झाला आहे. जुने शहरातील भांडपुरा चाैक, गुलजारपुरा चाैक, दगडी पूल, कमला वाशिम बायपास चाैक, उमरी, माेहम्मद अली चाैकातील मच्छी मार्केट आदी उघड्यावर मांसविक्रीच्या ठिकाणी माेकाट कुत्र्यांच्या झुंडी आढळून येतात. अशा भटक्या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी प्रभाग ४ मधील उमरीवासीयांनी केली आहे.

जठारपेठ चाैकात रस्त्यावर सांडपाणी

अकाेला : जठारपेठ चाैक ते उमरी मार्गावरील मुख्य नाली बुजविण्यात आल्यामुळे परिसरातील हाॅस्पिटल, इमारतींमधील सांडपाणी रस्त्यात साचत असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील नगरसेवकांसह मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

लसीकरणासाठी पुढाकार घ्या!

अकाेला : काेराेनाच्या संसर्गाला आळा बसावा या उद्देशातून नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर येताच नागरिकांनीदेखील लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे. काेराेना विषाणू अद्यापही कायम असल्याने लसीकरण माेहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात येत आहे.

पथकांचे रेस्टाॅरंटकडे दुर्लक्ष

अकाेला : जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीत दुकाने खुली करण्याची परवानगी दिली. तसेच हाॅटेल, रेस्टाॅरंट, खानावळी चालकांना पार्सल सुविधा देण्याचे निर्देश आहेत. तरीही काही खानावळी, रेस्टाॅरंटमध्ये नियम बाजूला सारत आतमध्ये ग्राहकांना जेवण दिले जात आहे. याकडे मनपासह महसूल प्रशासनाने गठीत केलेल्या पथकांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसत आहे.