शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

कैद्यांच्या पाल्यांच्या अनुदानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:19 IST

अकाेला कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या बंदीजनांच्या पाल्यांना शिक्षण व संगाेपनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत हे ...

अकाेला कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या बंदीजनांच्या पाल्यांना शिक्षण व संगाेपनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत हे अनुदान ४२५ रुपये दिले जात हाेते आता ते ११०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

सीसीआयने अवैध कर्जवुसली थांबवावी

अकाेला शेतकऱ्यांनी सीसीआयला विकलेल्या कापसाची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा प्रकार केला जात आहे. ही अवैध कर्जवसुली असून ती त्वरित थांबवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी वंचितचे उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, पराग गवई आदी उपस्थित हाेते.

एनसीसी विद्यार्थांनी राबविले स्वच्छता अभियान

अकाेला येथील शिवाजी महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी टिळक पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी प्राचार्य डाॅ. रामेश्वर भिसे, डाॅ. आनंद काळे, डाॅ. अश्विनी बलाेदे यांच्या मार्गदर्शनात आनंद भगत, साक्षी नवलकार, रितेश गव्हाणे, पूनम जावळे, प्रीती ठाकूर, साक्षी देवकर, समीक्षा राऊत आदींनी सहभाग घेतला.

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित!

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन गत वर्षभरापासून अनियमित होत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गत वर्षभरात अनेकदा कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटी वेतन दिले जाते. अनियमित वेतनासंदर्भात गुरुवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वाळू घाटांचा लिलाव करा

अकाेला वाळू घाटांचा लिलाव न केल्यामुळे सध्या अवैध रेतीची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे, तसेच अवैधरीत्या रेतीचा उपसाही केला जात आहे. हे थांबविण्यासाठी वाळू घाटांचा लिलाव करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

ग्रामीण भागातील बसफेऱ्या अनियमित

बाेरगावमंजू : लॉकडाऊन दरम्यान बंद असलेली एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली, मात्र अजूनही अनेक ग्रामीण भागात बसफेऱ्या अनियमित सुरू आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे. ग्रामीण भागात नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.