शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डाळ उत्पादक व विक्रेत्यांवर आयकर विभागाचे लक्ष!

By admin | Updated: April 25, 2016 01:56 IST

दर नियंत्रणाबाहेर; व्यापा-यांच्या साखळीतून दरवाढीचा प्रकार घडल्याची शक्यता.

अकोला: डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि त्यामुळे डाळींची होत असलेली दरवाढ बघता, आयकर विभागाने आता डाळ उत्पादक (मिल) आणि विक्रेत्यांना लक्ष्य बनविले आहे. उपलब्ध साठा आणि झालेल्या व्यवहाराची तपासणी करून आयकर विभाग करचुकवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील डाळवर्गीय पिकांची स्थिती गत तीन वर्षांपासून अत्यंत वाईट आहे. मोठय़ा प्रमाणात उत्पादन घटले. त्यामुळे केंद्र सरकारला डाळ आयात करावी लागली होती. गतवर्षी डाळीचे दर २00 रुपये किलोवर पोहोचले होते. त्यामुळे केंद्र सरकारने डाळींची साठवणूक करण्यावर प्रतिबंध लादला होता. यावर्षीसुद्धा डाळवर्गीय पिकांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यातून डाळींचा तुटवडा निर्माण होत असल्याने, एप्रिल महिन्यातच दर वाढू लागले आहेत. देशाला डाळ पुरवठा करणारे अकोला हे एक महत्वाचे केंद्र असून, येथील होलसेल बाजारातील तूर डाळीच्या दरात ४.६५ टक्के वाढ नोंदविली गेल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. उडीद डाळीच्या दरात १२ टक्के, तर हरभरा डाळीच्या दरात सर्वाधिक १२ टक्के दरवाढ नोंदविली गेली. एप्रिलमध्ये तूर डाळ नऊ हजार रुपये क्विंटल, तर उडीद डाळ ११,२५0 रुपये क्विंटल विकली जात आहे. हरभरा डाळ ५,३00 रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. येणार्‍या काळात डाळींचे उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दर नियंत्रणाबाहेर जात असल्याने आयकर विभागाने डाळ उत्पादकांकडे मोर्चा वळविला आहे. डाळीच्या वाढलेल्या दरानंतर झालेल्या व्यवहारात मोठी अनियमितता होऊन आयकर चुकविण्याचा प्रकार घडला असण्याची वर्तविली जात आहे. डाळ उत्पादक व विक्रेत्यांनी साखळी तयार करून डाळींचे दर वाढविले असण्याची शक्यता असल्याने आयकर विभागाने त्यासंदर्भात तपासणी सुरू केली आहे. २१ एप्रिल रोजी आयकर विभागाने अकोला येथील काही डाळ उत्पादक व विक्रेत्यांकडील दस्तावेजांची तपासणी केल्याची माहिती आहे. राज्यातील अकोला, जळगाव, मुंबई आदी शहरांसह देशभरातील २२ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आला. डाळींचे दर वाढण्यास सुरुवात होताच केलेली ही कारवाई बघता, डाळ उत्पादक व विक्रेत्यांवर आता आयकर विभागानेही लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येते. पुरवठा विभागाकडे जुनाच आदेश देशात डाळींचे दर वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजनासुरू केल्या आहेत. सप्टेंबर २0१६ पर्यंत डाळींची साठवणूक करण्यास प्रतिबंध लादण्यात आला आहे. असे असतानाही पुरवठा विभागाला कोणत्याही नवीन सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. जुनाच आदेश या विभागाकडे असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सांगितले.