शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

घरकुल लाभार्थींची अनुदानासाठी अडवणूक

By admin | Updated: May 18, 2014 20:40 IST

इंदिरा व रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर अनुदान मिळण्यास प्रशासनाकडून विलंब !

आगर (अकोला) : येथे दारिद्र्यरेषेखालील पात्र कुटुंबांना इंदिरा व रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अनेक घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी काही लाभार्थींना दुसर्‍या हप्त्याच्या अनुदानासाठी नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगर येथील दारिद्र्यरेषेखालील पात्र कुटुंबांना वर्ष २०१२-१३ मध्ये रमाई आवास व इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाली आहेत. या लाभार्थींना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी घरकुलाचे काम सुरू केले. या लाभार्थींपैकी अनेकांना दुसर्‍या हप्त्याचे अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी घरकुलाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे नेले असून, त्यांना आता तिसर्‍या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तथापि, या लाभार्थींपैकी काही जणांना अजूनही दुसर्‍या हप्त्याचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या घरकुलांची कामे रखडलेली आहेत. दुसर्‍या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी या लाभार्थींकडून गाव पातळीवर पैशांची मागणी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. चिरीमिरी देण्यास नकार देणार्‍यांना त्यांचे घरकुल रद्द केले जाईल, अशी धमकीही दिली जात आहे. शासनाच्या योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थींना गावपातळीवर नाहक त्रास दिला जात असल्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र आगरमध्ये पहावयास मिळत आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे या लाभार्थींचे घरकुलाचे काम पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे; परंतु प्रशासनाकडून त्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यामुळे लाभार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. लाभार्थींचा निधी नेमका कुठे अडविला जात आहे, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.