शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज - राज्यपाल रमेश बैस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 20:21 IST

Governor Ramesh Bais : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

अकोला : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का हाेतात, याची कारणे शोधून शेतकऱ्यांना सक्षम कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शनिवार, १० जून रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल ग्रॅन्ड जलसा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित हाेते. अध्यक्षस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते.

राज्यपाल बैस म्हणाले की, छत्तीसगड राज्यामध्ये कर्ज सुविधा गावातच उपलब्ध केली आहे. साेसायटीमधून शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना उत्पादित केलेले धान बाजारात जाऊन विकावे लागत नाही. गावातील साेसायटी ते विकत घेऊन आपले कर्ज फेड करून घेते, त्यामुळे वसुलीचाही प्रश्न उरत नाही. या याेजनेची सर्व कागदपत्रे महाराष्ट्र सरकारला देणार आहे. सरकारने ती कागदपत्रे तपासून अशी याेजना महाराष्ट्रात लागू करता आली तर ते माेठ्या पुण्याचे काम हाेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल म्हणाले, मी जगभरात फिरत असताना कुठल्याही बाजारपेठेत मेड इन चायना वस्तू दृष्टीस पडल्या. पूर्वी मेड इन जपान दिसायचे. परंतु मला विश्वास आहे की, एकविसावे शतक हे भारताचे असेल आणि सर्वत्र मेड इन भारत दिसेल. भारत हा युवकांचा देश आहे. आमच्याकडे गुणवत्ता आहे. छोटे-छाेटे काम करणाऱ्या तरुणांसाठी छत्तीसगडमध्ये राबविल्या गेलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाप्रमाणेच महाराष्ट्रात कुशल कारागिरांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले, त्यांची नाेंदणी केली तर आमचे तरुण विदेशांमध्ये जातील. त्यांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.

प्रारंभी राज्यपाल बैस यांचा ‘लाेकमत’च्या वतीने श्रद्धेय बाबूजींवर भारत सरकारने काढलेले टपाल तिकीट, सुवर्णमुद्रा ग्रंथ, ‘बाबूजी’ कॉफी टेबल बुक तसेच स्मृतिचिन्ह देऊन डाॅ. विजय दर्डा व राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला.

 

लाेकमत लाेकशाहीचा आवाज

‘लाेकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा हे जननायक हाेते. त्यांनी लाेकमत हे सामान्य लाेकांचे वर्तमानपत्र बनविले. लाेकमतचा इतिहास राेमांचकारी आहे. आज लाेकमत राज्यासह गाेवा, दिल्लीत पाेहाेचला असून, लाेकमत लाेकशाहीचा आवाज बनला आहे, अशा शब्दांत राज्यपाल यांनी ‘लाेकमत’चा गाैरव केला. ते म्हणाले, “मी महाराष्ट्रात आल्यावर ‘लाेकमत’चा वाचक झालाे. आता दिल्लीत गेल्यावरही ‘लाेकमत’ वाचायला मिळताे याचे समाधान आहे. ‘लाेकमत’चे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांनी डिजिटल आवृत्तीमधून ‘लाेकमत’ला ग्लाेबल वर्तमानपत्र बनविले असून, इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत ‘लाेकमत’मध्ये ग्रामीण व शहरी बातम्यांचा समन्वय साधला जाताे, असे निरीक्षण त्यांनी नाेंदविले. ‘लाेकमत’ने राजकीय भूमिका घेऊन काेण्या एका पक्षाची पाठराखण केल्याचे दिसले नाही, मी कधीही ‘लाेकमत’ला काेणाचेही चारित्र्यहनन करताना बघितले नाही,” असे गाैरवाेद्गार त्यांनी काढले.

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसAkolaअकोला