शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रब्बी हंगाम देवाच्या भरवशावर; आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पेरणी

By रवी दामोदर | Updated: November 22, 2023 18:54 IST

यंदाही कृषी विभागामार्फत १.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र अपेक्षित होते. मात्र, पावसाने दडी दिल्याने पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

अकोला : यंदा जिल्ह्यात तब्बल २८ टक्के पावसाची तूट असून, परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ ३८ टक्केच पेरणी आटोपली आहे. जमिनीत ओलावा कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. रब्बीत सार्वाधिक हरभरा पिकाची पेरणी झाली असून, गहू पिकासह इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यात आता परतीच्या पावसाचा अंदाजही दिसून येत नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम देवाच्याच भरवशावर असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात सरासरी १.२१ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षित असते. गत दोन वर्षांमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढून १.५० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते. यंदाही कृषी विभागामार्फत १.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र अपेक्षित होते. मात्र, पावसाने दडी दिल्याने पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. खारपाणपट्ट्यात हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले नसल्याचे चित्र आहे. सोयाबीन सोंगणी आटोपल्यानंतर जमिनीत ओलावा कमी असल्याने यंदा रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाला. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी गहू पिकाकडे पाठ केल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार दि.२२ नोव्हेंबरपर्यंत ४६ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

हरभऱ्याची पेरणीही केवळ ३६ टक्के

खारपाणपट्ट्यात कोरवाहू शेतीत हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, यंदा जमिनीत ओलावा कमी असल्याने अशा शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात प्रचंड घट झाली आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३०९ हेक्टर अपेक्षित असताना, केवळ ३६,०८६ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे. हे प्रमाण केवळ ३६ टक्के आहे.