शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोल्यात कॉंग्रेसचा ‘रोटी बचाओ’ मोर्चा शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

By रवी दामोदर | Updated: March 14, 2023 18:11 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने सर्व सामान्यांचे रेशन बंद करण्याचा डाव आखला असून, जनतेचा रेशन धान्याचा हक्क काढुन घेण्याचा निर्णय परीपत्रकाद्वारे घेतल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

अकोला: केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने सर्व सामान्यांचे रेशन बंद करण्याचा डाव आखला असून, जनतेचा रेशन धान्याचा हक्क काढुन घेण्याचा निर्णय परीपत्रकाद्वारे घेतल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. भाजपा सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने दि.१४ मार्च रोजी ‘रोटी बचाओ जनआंदोलन’ मोर्चा काढण्यात आला. शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.

याप्रसंगी ‘रेशन आमचे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘देश सामान्य जनतेचा, नाही कुणाच्या मालकीचा’अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळेपर्यंत जनआंदोलन सुरूच राहील, असे यावेळी सांगण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी केले. या मोर्चात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, कॉंग्रेस नेते प्रकाश तायडे, विवेक पारसकर, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे व कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष प्रमोद खंडारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करून पुढील चर्चेसाठी आमंत्रण दिले. या मोर्चात विजय देशमुख, तशवर पटेल, अतुल अमानकर, अफरोझ खान पठाण, अन्नपूर्णा पाटील, कैलाश पाटील, अंकुश देशमुख, जितेंद्र गुल्हाने, अश्रफ पटेल, रमेश बेटकर, विशाल इंगळे, राजेश नळकांडे, अतुल राहणे, सागर गावंडे, प्रकाश वाकोडे आदींचा सहभाग होता.