शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

सर्वच क्षेत्रात इनोव्हेशनला महत्व देण्याची गरज! -  डॉ. श्रीहरी मांडवगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:00 IST

प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सद्या आॅटोमोबाईल्स क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाला महत्व आहे. इनोव्हेशनला महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत. नवनिर्मितीवर भर दिला जात आहे. असे टाटा मोटर्समधील हेड आॅफ कार्पोरेट क्वालिटी विभागाचे जनरल मॅनेजर डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे यांनी शनिवारी सांगितले. आॅटोमोबाईल्स, कार्पोरेट क्षेत्राविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

आपण कार्पोरेट क्षेत्राकडे कसे वळले?मांडवगणे : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अकोल्यात घेतल्यानंतर अमरावती बीई मॅकेनिकल गेले. एमई करीत असतानाच, टाटा मोटर्समध्ये सहायक व्यवस्थापकपदी रूजु झाला. हळूहळू एक-एक टप्पा पुढे जात, टाटा मोटर्सच्या हेड आॅफ कार्पोरेट क्वालिटीचे काम माझ्याकडे आले. या विभागात काम करताना, इनव्हेंशन आणि इनोव्हेशन कसे करायचे. याची माहिती मिळाली. हा विषय सर्वांसाठीच महत्वाचा आहे.

कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनीत काम कशाला चालना दिली जाते?मांडवगणे : टाटा मोटर्समध्ये काम करताना, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे, जमशेदजी टाटा, जेआरडी टाटा, रतन टाटा यांची सकारात्मक विचारसरणी, त्यांनी जी दिशा दिली. ती प्रेरणादायी आहे. टाटांनी कधीच व्यावसायिक म्हणून काम केले नाही. येथे तंत्रज्ञान, व्यवस्थापनेला महत्व दिले जाते. व्यावसायिकतेसोबतच समाजाला आपण काय देऊ शकतो. याचा विचार अधिक होतो.

नॅनो टेक्नॉलॉजी का मागे पडली?मांडवगणे : यावर मी भाष्य करू शकत नाही. टाटा व इतर उद्योगपतींमध्ये खूप मोठा फरक आहे. ते व्यावसायिक म्हणून विचार करीत नाहीत. कोणतेही तंत्रज्ञान हे समाजाच्या भल्यासाठी असले पाहिजे. हा दृष्टीकोन महत्वाचा आहे. परंतु समाज काय करतो. यावर त्या तंत्रज्ञानाचे भवितव्य अवलंबून राहते. तंत्रज्ञान का मागे पडले. यापेक्षा नवनिर्मिती करण्यावर अमचा भर आहे.भविष्यातील कंपनीचे धोरण काय आहे?मांडवगणे : आॅटोमोबाईल्स क्षेत्रात इलेक्ट्रीक कार, सीएनजीचा वापर असणाऱ्या कार येणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्याला केंद्र शासनाचे सुद्धा पाठबळ आहे. कार व ट्रक निर्मितीचे काम आमच्या कारखान्यात चालते. सध्या आॅटोमोबाईल्समध्ये मंदीचे वातावरण आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर मात करण्यासाठी इनोव्हेशनची गरज आहे. शिक्षणासोबतच गुणवत्ता आवश्यक आहे. गुणवत्ता, अनुभव असेल तर संधीला वाव आहे. तरूणांनी शिक्षणासोबतच गुणवत्तेकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाTataटाटाAutomobile Industryवाहन उद्योग