शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा!

By admin | Updated: March 19, 2015 01:43 IST

विभागीय आयुक्तांचे निर्देश; अकोला जिल्ह्यातील कामांचा घेतला आढावा.

अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी बुधवारी येथे दिले.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बालेत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी अरुण शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांपैकी प्रत्येक गावात किमान एक-दोन जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजूरकर यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात जास्तीत-जास्त जलसंधारणाची कामे करण्याच्या सूचना देत, यंत्रणानिहाय जिल्ह्यातील कामाचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पाटबंधारे, लघू सिंचन व वन विभागासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.*गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्या!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रामुख्याने तलाव आणि बंधार्‍यांमधील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देऊन, गाळ काढण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.*सिंचन विहिरींची कामे पूर्ण करा!जिल्ह्यात धडक सिंचन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजूरकर यांनी या आढावा बैठकीत दिले.