शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हद्दवाढ क्षेत्रातील खासगी मालमत्तांवर अवैध कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:18 IST

महापालिकेत सामील झालेल्या हद्दवाढ क्षेत्रातील खासगी मालमत्तांवर अवैधरित्या कब्जा करून त्यावर केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेच्या माध्यमातून घरकूल उभारण्याचे ...

महापालिकेत सामील झालेल्या हद्दवाढ क्षेत्रातील खासगी मालमत्तांवर अवैधरित्या कब्जा करून त्यावर केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेच्या माध्यमातून घरकूल उभारण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार उजेडात आले आहेत. ‘पीएम’आवासचा लाभ घेण्यासाठी बनावट दस्तऐवज सादर केल्या जात असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. यामध्ये मागील अनेक वर्षांपासून गाव साेडून मनपा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या जागांवर अनधिकृत कब्जा करण्यात आल्याची माहिती आहे.

शहरालगतच्या गावाचा महापालिकेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या मुलभूत साेयी सुविधांवर ताण पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१५ मध्ये मनपाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला हाेता. यामध्ये १३ मुख्य ग्रामपंचायतीमध्ये सामील २४ गावाचा समावेश हाेता. या २४ गावामध्ये अवघ्या १०० ते १४० लाेकसंख्येचा समावेश असलेल्या काही लहान गावाचा समावेश हाेता. दरम्यान, हद्दवाढ हाेऊन चार वर्षांचा कालावधी हाेत असला तरी या भागात अद्यापही मुलभूत साेयी सुविधांची पूर्तता नसून या भागात पाेहाेचण्यासाठी धड रस्तेही नसल्याची परिस्थिती आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या वाकापूर, सुकापूर, नायगाव, प्रभाग ८ मधील डाबकी, प्रभाग १८ मधील हिंगणा बु.,अकाेली खु., आदी भागाचा समावेश आहे. अशा भागातून मागील काही वर्षांपूर्वी शहरात वास्तव्यास आलेल्या मालमत्ता धारकांच्या जमिनींवर स्थानिक रहिवासी अतिक्रमण उभारून कब्जा करीत असल्याचे प्रकार समाेर आले आहेत. अवैध जागेवर घरकूल उभारण्यासाठी तसेच मालमत्तेत नावाची नाेंद करण्याच्या उद्देशातून टॅक्स विभागात बाेगस कागदपत्रे सादर केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

कर वसुली लिपिकांची सतर्कता

खासगी मालमत्तेवर अवैधरित्या ताबा घेऊन त्यावर घरकूल बांधणे किंवा मालमत्तेची स्वत:च्या नावावर नाेंद करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली जात असल्याची बाब पश्चिम झाेनमध्ये कार्यरत काही कर वसुली लिपिकाच्या निदर्शनास आली आहे. लिपिकानी सतर्कता दाखवत असे प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती आहे.

हद्दवाढ क्षेत्रात मालकीचे खुले भूखंड असतील तर त्यांना मालमत्ता धारकांनी तारेचे कुंपण करावे. जागा बळकावण्याचा प्रयत्न केला असेल तर आमच्याकडे रितसर तक्रारी कराव्यात. नागरिकांनी सतर्क हाेण्याची गरज आहे.

-विजय पातरवार कर अधीक्षक,मनपा