शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आपत्कालीन स्थितीतही जीएमसीकडे दुर्लक्ष, हे जिल्हा प्रशासनाचे अपयश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

५ पैकी ४ डायलिसिस मशीन बंद सर्वोपचार रुग्णालयात पाच डायलिसिस मशीन असून त्यापैकी कोविड रुग्णांसाठीची केवळ एकच मशीन सुरू ...

५ पैकी ४ डायलिसिस मशीन बंद

सर्वोपचार रुग्णालयात पाच डायलिसिस मशीन असून त्यापैकी कोविड रुग्णांसाठीची केवळ एकच मशीन सुरू आहे. या कारणावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त करत गरज नसताना जिल्हा प्रशासनाने नावीन्यपूर्ण योजनेतून १ कोटी ६० लाखांचे एलईडी खरेदी केले, मात्र आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्याचे यावेळी आमदार सावरकर त्यांनी म्हटले. जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेकडे अशा परिस्थितीत तरी दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले. यासोबतच सीटी स्कॅन केलेल्या रुग्णांना त्याचा अहवाल डीव्हीडीमध्ये देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना दिल्या.

९२ दिवस झालेत रुग्णांना अंडे नाहीत

कोविड रुग्णांना सकस आहार मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांना जेवणासोबत अंडे देणे आवश्यक आहे, मात्र ९२ दिवस झालेत येथील रुग्णांना अंडे मिळालेले नाहीत. विविध सामाजिक संस्थांकडून अंडे देणे बंद झाले, म्हणून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनाने रुग्णांसाठी अंड्यांची व्यवस्था करावी, असेही यावेळी त्यांनी म्हटले.

कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर

शासनाने परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमा, आम्ही पैसे देऊ, असे सांगितले. त्यानंतर कोविड सेवेसाठी कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले. त्यांना आधी एसडीआरएफमधून जिल्हाधिकाऱ्यानी पैसे दिले. नंतर आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हात वर केले. आणि एनएचएमकडून पैसै घ्या, असे सांगितले. मात्र सीएस म्हणतात की, एनएचएमकडे असे पैसे देण्याचा प्रोटोकाॅल नाही. याबाबतही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

भ्रष्ट कंपन्यांना कंत्राट दिला कसा?

सर्वोपचार रुग्णालयाला कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात भ्रष्टाचार केला जातो. शासन नियमानुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान ९ हजार रुपये मानधन मिळणे अपेक्षित असून, त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून निधीही दिला जातो, मात्र संबंधित कंपनीकडून कर्मचाऱ्यांना केवळ पाच ते सहा हजार रुपये मानधन दिले जाते. उर्वरित पैसा जातो कुठे, अशा भ्रष्ट कंपन्यांना कंत्राट दिला कसा जातो, असा सवालही यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.