शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

आपत्कालीन स्थितीतही जीएमसीकडे दुर्लक्ष, हे जिल्हा प्रशासनाचे अपयश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

५ पैकी ४ डायलिसिस मशीन बंद सर्वोपचार रुग्णालयात पाच डायलिसिस मशीन असून त्यापैकी कोविड रुग्णांसाठीची केवळ एकच मशीन सुरू ...

५ पैकी ४ डायलिसिस मशीन बंद

सर्वोपचार रुग्णालयात पाच डायलिसिस मशीन असून त्यापैकी कोविड रुग्णांसाठीची केवळ एकच मशीन सुरू आहे. या कारणावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त करत गरज नसताना जिल्हा प्रशासनाने नावीन्यपूर्ण योजनेतून १ कोटी ६० लाखांचे एलईडी खरेदी केले, मात्र आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्याचे यावेळी आमदार सावरकर त्यांनी म्हटले. जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेकडे अशा परिस्थितीत तरी दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले. यासोबतच सीटी स्कॅन केलेल्या रुग्णांना त्याचा अहवाल डीव्हीडीमध्ये देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना दिल्या.

९२ दिवस झालेत रुग्णांना अंडे नाहीत

कोविड रुग्णांना सकस आहार मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांना जेवणासोबत अंडे देणे आवश्यक आहे, मात्र ९२ दिवस झालेत येथील रुग्णांना अंडे मिळालेले नाहीत. विविध सामाजिक संस्थांकडून अंडे देणे बंद झाले, म्हणून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनाने रुग्णांसाठी अंड्यांची व्यवस्था करावी, असेही यावेळी त्यांनी म्हटले.

कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर

शासनाने परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमा, आम्ही पैसे देऊ, असे सांगितले. त्यानंतर कोविड सेवेसाठी कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले. त्यांना आधी एसडीआरएफमधून जिल्हाधिकाऱ्यानी पैसे दिले. नंतर आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हात वर केले. आणि एनएचएमकडून पैसै घ्या, असे सांगितले. मात्र सीएस म्हणतात की, एनएचएमकडे असे पैसे देण्याचा प्रोटोकाॅल नाही. याबाबतही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

भ्रष्ट कंपन्यांना कंत्राट दिला कसा?

सर्वोपचार रुग्णालयाला कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात भ्रष्टाचार केला जातो. शासन नियमानुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान ९ हजार रुपये मानधन मिळणे अपेक्षित असून, त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून निधीही दिला जातो, मात्र संबंधित कंपनीकडून कर्मचाऱ्यांना केवळ पाच ते सहा हजार रुपये मानधन दिले जाते. उर्वरित पैसा जातो कुठे, अशा भ्रष्ट कंपन्यांना कंत्राट दिला कसा जातो, असा सवालही यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.