शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गरीब शेतक-यांसाठी ‘आयजी’ सरसावले !

By admin | Updated: September 1, 2016 02:38 IST

शेतक-यांची माहिती घेण्याची पाचही जिल्हय़ातील पोलिसांना सूचना.

सचिन राऊत अकोला, दि. ३१: यवतमाळ येथे एकाच झाडाला शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळीज चिरणारी घटना उघड झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्हय़ातील गरीब आणि गरजू शेतकर्‍यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मंगळवारी रात्री पोलीस अधिकार्‍यांना केल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत आणि शेतकरी बेताचीच परिस्थितीत जगत असलेल्या शेतकर्‍यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आधार मिळणार आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने जेरीस आलेल्या शेतकर्‍यांसमोर कुटुंब पोसण्याची प्रश्न निर्माण झाल्याने मोठय़ा प्रमाणात आत्महत्या वाढल्या आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर शेतकरी कुटुंबीयांसमोर जगण्याचे संकट उभे ठाकते. जगावे किंवा मरावे, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पोलीस विभाग सरसावला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय-योजना पोलिसांकडून राबविण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना केल्या आहेत. ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी आणि पोलीस कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून गरीब शेतकर्‍यांची एक यादी तयार करण्याचे सांगितले आहे. यासोबतच ज्या शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च जास्त आहे, ज्या शेतकर्‍यांच्या मुलीचे लग्न आहे, अशा शेतकर्‍यांची नोंदणी करून त्याची एक यादी तयार करुन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचेही प्रयत्न पोलिस विभागाकडून होत आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि संघटनांचीही मदत घेतली जाईल.