शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गरीब शेतक-यांसाठी ‘आयजी’ सरसावले !

By admin | Updated: September 1, 2016 02:38 IST

शेतक-यांची माहिती घेण्याची पाचही जिल्हय़ातील पोलिसांना सूचना.

सचिन राऊत अकोला, दि. ३१: यवतमाळ येथे एकाच झाडाला शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळीज चिरणारी घटना उघड झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्हय़ातील गरीब आणि गरजू शेतकर्‍यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मंगळवारी रात्री पोलीस अधिकार्‍यांना केल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत आणि शेतकरी बेताचीच परिस्थितीत जगत असलेल्या शेतकर्‍यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आधार मिळणार आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने जेरीस आलेल्या शेतकर्‍यांसमोर कुटुंब पोसण्याची प्रश्न निर्माण झाल्याने मोठय़ा प्रमाणात आत्महत्या वाढल्या आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर शेतकरी कुटुंबीयांसमोर जगण्याचे संकट उभे ठाकते. जगावे किंवा मरावे, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पोलीस विभाग सरसावला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय-योजना पोलिसांकडून राबविण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना केल्या आहेत. ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी आणि पोलीस कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून गरीब शेतकर्‍यांची एक यादी तयार करण्याचे सांगितले आहे. यासोबतच ज्या शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च जास्त आहे, ज्या शेतकर्‍यांच्या मुलीचे लग्न आहे, अशा शेतकर्‍यांची नोंदणी करून त्याची एक यादी तयार करुन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचेही प्रयत्न पोलिस विभागाकडून होत आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि संघटनांचीही मदत घेतली जाईल.