शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारविरोधात बोलला की तुम्ही देशद्रोही; म्हणून जनजागरण यात्रा"

By आशीष गावंडे | Updated: February 21, 2023 17:43 IST

मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. ...

मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. बेसुमार वाढलेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केंद्र व राज्य सरकारकडून डोळेझाक केली जात आहे. यावर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला की त्याच्या मस्तकी देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा ट्रेंड सुरु झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा माजी मंत्री फौझिया खान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वाढलेली महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला कार्यकारिणीच्यावतीने राज्यभरात जनजागरण यात्रा काढली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ झालेली यात्रा मंगळवारी अकोल्यात दाखल झाली असता, राकाँच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौझिया खान यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरले असून बेरोजगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना भाजपाचे नेते सातत्याने टीका करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत होते. परंतु आता अनेक समस्या असल्या तरी त्यावर भाजपाकडून चूप्पी साधली जात असून तरुणांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे. 

आज देशात १ टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती असणे हे चित्र योग्य नसल्याचे फौझिया खान म्हणाल्या. पत्रकार परिषदेला जनजागरण यात्रेच्या राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे, महिला निरीक्षक मंदाकिनी पाटील, निरीक्षक प्रवीण कुंटे, डॉ.आशा मिरगे, मंदा देशमुख, महिला शहराध्यक्ष सुषमा निचळ, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, मा.नगरसेवक मनोज गायकवाड, पंकज गावंडे, रायुकाँ शहराध्यक्ष अजय मते, बुडन गाडेकर उपस्थित होते.

विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न!

लोकशाहीमध्ये काही बाबींना विरोध होणारच. परंतु सरकारला हा विरोध सहन होत नसल्यामुळे विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांनाच संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला असता भाजपचा दारुण पराभव झाला. यावरुनच इव्हीएममध्ये हेराफेरी होते,हे लक्षात येत असल्याचे फौझिया खान यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला