शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

"सरकारविरोधात बोलला की तुम्ही देशद्रोही; म्हणून जनजागरण यात्रा"

By आशीष गावंडे | Updated: February 21, 2023 17:43 IST

मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. ...

मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. बेसुमार वाढलेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केंद्र व राज्य सरकारकडून डोळेझाक केली जात आहे. यावर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला की त्याच्या मस्तकी देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा ट्रेंड सुरु झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा माजी मंत्री फौझिया खान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वाढलेली महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला कार्यकारिणीच्यावतीने राज्यभरात जनजागरण यात्रा काढली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ झालेली यात्रा मंगळवारी अकोल्यात दाखल झाली असता, राकाँच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौझिया खान यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरले असून बेरोजगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना भाजपाचे नेते सातत्याने टीका करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत होते. परंतु आता अनेक समस्या असल्या तरी त्यावर भाजपाकडून चूप्पी साधली जात असून तरुणांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे. 

आज देशात १ टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती असणे हे चित्र योग्य नसल्याचे फौझिया खान म्हणाल्या. पत्रकार परिषदेला जनजागरण यात्रेच्या राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे, महिला निरीक्षक मंदाकिनी पाटील, निरीक्षक प्रवीण कुंटे, डॉ.आशा मिरगे, मंदा देशमुख, महिला शहराध्यक्ष सुषमा निचळ, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, मा.नगरसेवक मनोज गायकवाड, पंकज गावंडे, रायुकाँ शहराध्यक्ष अजय मते, बुडन गाडेकर उपस्थित होते.

विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न!

लोकशाहीमध्ये काही बाबींना विरोध होणारच. परंतु सरकारला हा विरोध सहन होत नसल्यामुळे विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांनाच संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला असता भाजपचा दारुण पराभव झाला. यावरुनच इव्हीएममध्ये हेराफेरी होते,हे लक्षात येत असल्याचे फौझिया खान यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला