शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

"सरकारविरोधात बोलला की तुम्ही देशद्रोही; म्हणून जनजागरण यात्रा"

By आशीष गावंडे | Updated: February 21, 2023 17:43 IST

मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. ...

मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. बेसुमार वाढलेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केंद्र व राज्य सरकारकडून डोळेझाक केली जात आहे. यावर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला की त्याच्या मस्तकी देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा ट्रेंड सुरु झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा माजी मंत्री फौझिया खान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वाढलेली महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला कार्यकारिणीच्यावतीने राज्यभरात जनजागरण यात्रा काढली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ झालेली यात्रा मंगळवारी अकोल्यात दाखल झाली असता, राकाँच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौझिया खान यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरले असून बेरोजगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना भाजपाचे नेते सातत्याने टीका करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत होते. परंतु आता अनेक समस्या असल्या तरी त्यावर भाजपाकडून चूप्पी साधली जात असून तरुणांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे. 

आज देशात १ टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती असणे हे चित्र योग्य नसल्याचे फौझिया खान म्हणाल्या. पत्रकार परिषदेला जनजागरण यात्रेच्या राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे, महिला निरीक्षक मंदाकिनी पाटील, निरीक्षक प्रवीण कुंटे, डॉ.आशा मिरगे, मंदा देशमुख, महिला शहराध्यक्ष सुषमा निचळ, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, मा.नगरसेवक मनोज गायकवाड, पंकज गावंडे, रायुकाँ शहराध्यक्ष अजय मते, बुडन गाडेकर उपस्थित होते.

विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न!

लोकशाहीमध्ये काही बाबींना विरोध होणारच. परंतु सरकारला हा विरोध सहन होत नसल्यामुळे विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांनाच संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला असता भाजपचा दारुण पराभव झाला. यावरुनच इव्हीएममध्ये हेराफेरी होते,हे लक्षात येत असल्याचे फौझिया खान यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला