शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पक्षामध्ये बोलता आले असते, तर लेख कशाला लिहिला असता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:42 IST

अकोला : भाजपा सत्तेत आली याचा आनंद आहे, माझा पक्ष असल्यामुळे पुढेही आमची सत्ता राहो, ही आशा व इच्छा आहे; मात्र आज मी सरकारच्या धोरणांविरोधात जाहीरपणे बोलत आहे. अशावेळी अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडले नाही. मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत आपल्या मनातील व्यथा उघड केली.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांचा धडधडीत सवालपक्षातील कार्यप्रणालीवर ठेवले बोट!

अकोला : भाजपा सत्तेत आली याचा आनंद आहे, माझा पक्ष असल्यामुळे पुढेही आमची सत्ता राहो, ही आशा व इच्छा आहे; मात्र आज मी सरकारच्या धोरणांविरोधात जाहीरपणे बोलत आहे. अशावेळी अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडले नाही. मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत आपल्या मनातील व्यथा उघड केली.प्रमिलाताई ओक हॉलमध्ये जाहीर व्याख्यान संपल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपली संस्कृती ही ज्येष्ठांचा आदर करणारी, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन पुढे मार्गक्रमण करणारी आहे. त्यादृष्टीने विचार केला, तर सध्या भाजपामध्ये ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, हे मान्यच करावे लागेल. प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते, जेथे ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, त्या घरातील मुलांबाबत काय म्हटले जाते, ते आपणास माहीत आहे, असा टोला लगावत त्यांनी हा संस्कृतीशी निगडित प्रश्न आहे. पार्टीच्या नियमांचा नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.  सरकारच्या अनेक धोरणांमध्ये विसंगती आहे, जीएसटीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, तरच हा गुड अँण्ड सिम्पल टॅक्स होईल, असे स्पष्ट करतानाच कोणतेही आर्थिक धोरण स्वीकारताना त्याचा फायदा-तोटा काय होईल, हे सांगावे लागते. सरकारमध्ये सध्या खूप लायक लोक बसलेले आहेत, त्यांनी जीएसटीचा फायदा सांगावा, असे आव्हान त्यांनी दिले. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असलाच पाहिजे, हा आग्रह नाही; मात्र शेतीचे निश्‍चित असे आर्थिक धोरण आवश्यक आहे. या धोरणांना नशिबाचीही साथ लागते, मान्सूनवर या धोरणांचे यश-अपयश अवलंबून असते, त्यामुळे या सरकारने अशा धोरणांचा पुनर्विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढती महागाई व बेरोजगारी हे जिव्हाळय़ाचे प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक झाल्याशिवाय लोकांचा विश्‍वास कमावता येत नाही. या मुद्यावर भाजपा सरकार अपयशी ठरल्याचीही टीका त्यांनी केली. 

पार्टीचे नियम बदलत राहतातकम्युनिस्ट पार्टीमध्ये राज्यसभा सदस्यत्व देण्यासाठी केवळ दोन टर्मची अट आहे, तिचे कसोशीने पालन केले जाते. सीताराम येचुरीसारख्या ज्येष्ठ व प्रभावी नेत्यालाही तिसरी टर्म मिळाली नाही. आमच्या पक्षानेही असेच धोरण स्वीकारले व दोन ज्येष्ठ नेत्यांना राज्यसभेवर संधी दिली नाही. त्यानंतर मात्र हा नियम बदलला व  आता चार टर्मवाले नेतेही आमच्याच पक्षात आहेत, त्यामुळे पक्षाचे नियम हे बदलते राहतात, अशा शब्दांत सिन्हा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.-

टॅग्स :Politicsराजकारण