शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

निधी खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षणाचे गुण होतील कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:26 IST

३१ मार्चपूर्वी विकास कामांवर निधी खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मधील गुण कमी होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला: महापालिकांना वितरित करण्यात आलेल्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसह नागरी दलित वस्ती योजना, दलितेतर योजनेसाठी प्राप्त निधीतून विकास कामे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. ३१ मार्चपूर्वी विकास कामांवर निधी खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मधील गुण कमी होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर योजना, रमाई घरकुल आवास योजनेचा समावेश आहे. यामध्ये रस्ते, नाल्या, पथदिवे, सामाजिक सभागृह, पाणी पुरवठा योजना, उद्यानांचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांचा समावेश आहे. प्राप्त निधीत महापालिका प्रशासनाला त्यांचा आर्थिक हिस्सा जमा करावा लागतो. यातील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजना तसेच रमाई घरकुल आवास योजनेचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त होतो. सदर निधीत महापालिकेला आर्थिक हिस्सा जमा करणे क्रमप्राप्त असून, त्यानंतरच मनपा प्रशासनाकडून विकास कामांचे प्रस्ताव मागितले जातात. नगरसेवकांकडून विकास कामांची यादी मिळाल्यानंतर बांधकाम विभागाकडून प्रस्तावांची छाननी केल्या जात असली, तरी या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतरही विकास कामांचे कार्यादेश (वर्कआॅर्डर) जारी होत नसल्याने अखर्चित निधी शासनाकडे परत पाठविण्याची महापालिकांवर नामुश्की ओढवते. या सर्व बाबी लक्षात घेता विकास कामांसाठी दिले जाणारे अनुदान ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत केल्या जाणाऱ्या तपासणीदरम्यान गुण कमी होणार असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.पुनर्मूल्यांकन केले; वसुली ठप्प!‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे, मालमत्ता कर वसुली ९० टक्के केल्यानंतरच स्वायत्त संस्थांच्या गुणानुक्रमात वाढ होणार आहे. ‘ड’ वर्ग महापालिकांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले असले तरी वसुली ३० टक्क्यांपेक्षा अधिक नसल्याची परिस्थिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान