शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत नसेल तर ‘ब्लॅकमेलिंग’ होते!

By admin | Updated: February 18, 2017 02:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; विकासाच्या मुद्यावर सरकार नेहमीच पाठीशी

अकोला, दि. १७- शहराच्या विकासाचे 'व्हिजन' पूर्ण करावयाचे असेल, तर महापालिके च्या निवडणुकीत बहुमत द्या. अन्यथा सत्ता स्थापन करताना ह्यब्लॅकमेलिंगह्णचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो त्यामुळे बहूमतासह महापालिका ताब्यात सोपवा, तुमच्या स्वप्नातले शहर घडवण्यासाठी पाहिजे तेवढा निधी देतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी स्थानिक अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेस संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कधीकाळी नगर परिषदेच्या कार्यकाळात अकोला शहराचा नावलौकिक संपूर्ण राज्यात होता. पुढे काँग्रेसच्या राजवटीत शहराचे गतवैभव लोप पावले. भारतीय जनता पक्षाने मात्र उण्यापुर्‍या अडीच वर्षांच्या सत्तेच्या कालावधीत शहरामध्ये कोट्यवधींची विकास कामे केली आहेत. शहराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भाजप हाच सशक्त पर्याय असल्याचे सांगून, शहराचा विकास कसा करायचा, याची जाण पक्षाच्या नेतृत्वाला असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २५४ कोटींचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील ११0 कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा केले आहेत. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात वान धरणाच्या पाण्याचा शहरासाठी विचार केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. शहरातील सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जाते. नाले-गटारांमधील घाण पाण्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. यासाठी आपणच दोषी आहोत. यामुळे रोगराई पसरण्यास हातभार लागत असून, दरवर्षी निर्माण होणारे साथीचे रोग आपल्यामुळेच तयार झाले आहेत. यावर ठोस उपाय म्हणून भूमिगत गटार योजनेचा समावेश ह्यअमृतह्ण योजनेत करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. ते पाणी उद्योगांसाठी वापरता येणार असून, पाणीपुरवठा योजनेनंतर, भूमिगतच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरप्रमाणो अकोल्यातही २४ तास पाणी पुरवठा करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांनाच नव्हे तर ज्यांच्याकडे हक्काचे घर नसेल त्या सर्वांना २0२२ पर्यंत घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापूर्वीच्या योजना फसव्या होत्या. मर्जीतल्या लोकांची तोंडे पाहून घरे दिली जात होती, असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन राज्य सरकारला काढला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खा. संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर,आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीष पिंपळे, महापौर उज्ज्वला देशमुख, प्रदेश संगठन मंत्री रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, विजय अग्रवाल, अकोट नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, डॉ. अशोक ओळंबे उपस्थित होते. आ. शर्मा, सावरकरांचे कौतुकलालाजी (आ. गोवर्धन शर्मा) कमी बोलतात; मात्र विकास कामांप्रती त्यांची 'अँक्शन' जास्त असते. त्यामुळे त्यांना प्रचंड निधी दिला असून पुढेही भविष्यात देत राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शहरालगतच्या गावांचा मनपाच्या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत असल्याने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव आमदार रणधीर सावरकर यांनी मांडला होता. विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याची भूमिका आ. सावरकरांनी स्पष्ट केल्यानंतर हद्दवाढीचा निर्णय घेतला. नवीन भागासाठी २0 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार, राज्याचे नगर विकास राज्यमंत्री व आमदारांचे मस्त 'कॉम्बिनेशन'आहे. असा योग पुन्हा येणे नाही, त्यामुळे विकासाचे व्हिजन तयार ठेवा आणि निधी घेऊन जा, असा सल्ला यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. नामदार-खासदारांनी दिली विजयाची ग्वाही !गतवेळी पक्षाचे १८ नगरसेवक विजयी झाले होते. यंदा आम्ही ४५ चा आकडा पार करू, असा विश्‍वास खा. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. आम्ही केवळ माध्यम आहोत, ह्यमेन स्वीचह्णतुमच्याकडेच असल्याचे खा. धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांक डे पाहून सांगितले. जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगरपालिका, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बहुमताने जिंकल्यानंतर आता महापालिका निवडणूकही निर्भेळ बहुमताने जिंकून देतो, असा दावा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केला.