शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

वसुली न केल्यास ग्रा.पं. बरखास्त

By admin | Updated: February 28, 2017 01:58 IST

जिल्हा परिषद; सीईओंनी दिले गटविकास अधिका-यांना निर्देश

अकोला, दि. २७- ग्रामपंचायतीकडे थकीत असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची रक्कम वसूल न झाल्यास त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह पदाधिकारी, सचिवांवर कायद्यानुसार बरखास्तीचा प्रस्ताव गटविकास अधिकार्‍यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी सोमवारी बैठकीत दिले. प्रत्येक तालुक्यातून दरमहा किमान दहा ते बारा लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या ८८ गावांतील पाणीपट्टी वसुली अत्यल्प आहे. या गावांतील पाणीपट्टी वसुलीसाठी सोमवारी दुपारी जिल्हा परिषद सभागृहात बैठक घेण्यात आली. पाणीकराची किमान ७0 टक्के वसुली न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ८४ खेडी योजनेतून ८८ गावांना पुरवठा केला जातो. त्या गावांची वसुली केवळ १.४0 टक्के आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील ६८, अकोला तालुक्यातील नऊ आणि तेल्हारा तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. त्या गावांतील वसुली करण्यासाठी आता पथके गठित केली जाणार आहेत. त्या पथकांकडून थकीत रक्कम वसुलीसाठी गावांतील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली जाणार आहे. सोबतच सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सचिवांनीही पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले. त्यांनी तसे न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१) नुसार कारवाईचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. वसुलीसाठी रोजंदारीवर कामगार घेण्याची सूटही देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित सरपंच, सचिव, गटविकास अधिकार्‍यांनी वसुली करण्यासाठी सहमती दर्शवली. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता तिडके, अकोल्याचे गटविकास अधिकारी जी.के. वेले, श्रीकांत फडके, कालिदास तापी यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते. आज सभाजिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी विषयपत्रिकेवर विषय नसल्याने ऐनवेळीच्या विषयावरून सभेतील कामकाज ठरणार आहे.