शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

‘मरण यावे तर असे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:04 IST

अकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.

ठळक मुद्देहिमस्खलनात शहीद जवानांच्या अंतिम संस्कारावर सुमेधची होती प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.काश्मीरमध्ये सेवा सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सुमेध गवई अकोल्यात आला होता. नेमके याच महिन्यात झालेल्या भूस्खलनात माना येथील रहिवासी संजय सुरेश खंडारे आणि वाशिम बायपास परिसरातील रहिवासी आनंद शत्रुघ्न गवई या दोन भारत मातेच्या सुपुत्रांना हिमस्खलनात वीरमरण आले होते. या दोघांवरही शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. जवानांनी २१ तोफांची सलामी दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सैन्यातील अधिकारी या दोन्ही जवानांना सलामी देत असल्याचे छायाचित्र आणि वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त आणि छायाचित्र पाहत असताना सुमेधने जिवलग आणि बालपणीचा हातला येथील मित्र मंगेश रमेश दानडे याच्याशी बोलताना अशा प्रकारच्या वीरमरणाची इच्छा व्यक्त केली. मरण तर प्रत्येकालाच आहे; मात्र अशा प्रकारचे वीरमरण आल्यास जीवनाचे सार्थक होणार असल्याचे विचार सुमेधने बोलून दाखविले. मंगेशशी या विषयावरून किरकोळ वादही झाला; मात्र विषय बदलला आणि वाद मिटला. सुमेध व मंगेश दोघांनीही सैन्यात भरती होण्यासाठी सोबतच मेहनत घेतली.  दोघांनीही सोबतच भरतीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुमेधला यश मिळाले; मात्र मंगेश अयशस्वी झाला.