शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘मरण यावे तर असे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:04 IST

अकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.

ठळक मुद्देहिमस्खलनात शहीद जवानांच्या अंतिम संस्कारावर सुमेधची होती प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.काश्मीरमध्ये सेवा सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सुमेध गवई अकोल्यात आला होता. नेमके याच महिन्यात झालेल्या भूस्खलनात माना येथील रहिवासी संजय सुरेश खंडारे आणि वाशिम बायपास परिसरातील रहिवासी आनंद शत्रुघ्न गवई या दोन भारत मातेच्या सुपुत्रांना हिमस्खलनात वीरमरण आले होते. या दोघांवरही शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. जवानांनी २१ तोफांची सलामी दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सैन्यातील अधिकारी या दोन्ही जवानांना सलामी देत असल्याचे छायाचित्र आणि वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त आणि छायाचित्र पाहत असताना सुमेधने जिवलग आणि बालपणीचा हातला येथील मित्र मंगेश रमेश दानडे याच्याशी बोलताना अशा प्रकारच्या वीरमरणाची इच्छा व्यक्त केली. मरण तर प्रत्येकालाच आहे; मात्र अशा प्रकारचे वीरमरण आल्यास जीवनाचे सार्थक होणार असल्याचे विचार सुमेधने बोलून दाखविले. मंगेशशी या विषयावरून किरकोळ वादही झाला; मात्र विषय बदलला आणि वाद मिटला. सुमेध व मंगेश दोघांनीही सैन्यात भरती होण्यासाठी सोबतच मेहनत घेतली.  दोघांनीही सोबतच भरतीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुमेधला यश मिळाले; मात्र मंगेश अयशस्वी झाला.