शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

‘मरण यावे तर असे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:04 IST

अकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.

ठळक मुद्देहिमस्खलनात शहीद जवानांच्या अंतिम संस्कारावर सुमेधची होती प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.काश्मीरमध्ये सेवा सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सुमेध गवई अकोल्यात आला होता. नेमके याच महिन्यात झालेल्या भूस्खलनात माना येथील रहिवासी संजय सुरेश खंडारे आणि वाशिम बायपास परिसरातील रहिवासी आनंद शत्रुघ्न गवई या दोन भारत मातेच्या सुपुत्रांना हिमस्खलनात वीरमरण आले होते. या दोघांवरही शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. जवानांनी २१ तोफांची सलामी दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सैन्यातील अधिकारी या दोन्ही जवानांना सलामी देत असल्याचे छायाचित्र आणि वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त आणि छायाचित्र पाहत असताना सुमेधने जिवलग आणि बालपणीचा हातला येथील मित्र मंगेश रमेश दानडे याच्याशी बोलताना अशा प्रकारच्या वीरमरणाची इच्छा व्यक्त केली. मरण तर प्रत्येकालाच आहे; मात्र अशा प्रकारचे वीरमरण आल्यास जीवनाचे सार्थक होणार असल्याचे विचार सुमेधने बोलून दाखविले. मंगेशशी या विषयावरून किरकोळ वादही झाला; मात्र विषय बदलला आणि वाद मिटला. सुमेध व मंगेश दोघांनीही सैन्यात भरती होण्यासाठी सोबतच मेहनत घेतली.  दोघांनीही सोबतच भरतीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुमेधला यश मिळाले; मात्र मंगेश अयशस्वी झाला.