शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे

By admin | Updated: May 18, 2014 20:57 IST

ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावत असून,विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षणसंस्थांकडे वळत आहे.

बाभुळगाव जहागीर (अकोला): ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक गावात जि.प. च्या उर्दू आणि मराठी शाळांत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध क रू न दिल्या; परंतु शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांची नीट अंमलबजावणीच होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांचा दर्जा खालावत असून, भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावा, शिक्षणाची गंगा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचावी, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाने सर्वशिक्षा अभियान योजना अस्तित्वात आणली. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक गावातील जि.प. मराठी आणि उर्दू शाळांसाठी सुसज्ज अशा इमारती बांधल्या. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पोषण आहार, गणवेश, पुस्तके, दप्तर आदी सुविधाही पुरविल्या, तसेच प्रत्येक शाळेत संगणक आणि प्रयोगशाळेची सुविधाही उपलब्ध करून दिली. महत्त्वाचे म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहणे आवश्यक केले. या सर्व सोयी-सुविधांमुळे ग्रामीण भागांसह शहरात असलेल्या शासकीय शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, हा शासनाचा विचार फोल ठरला कारण या सोयी-सुविधांची नीट अंमलबजावणीच केल्या जात नसून, कित्येक शाळांतील शिक्षक मुख्यालयीसुद्धा राहत नाहीत. कित्येक ठिकाणी संगणक असूनही विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील ज्ञान दिले जात नाही. अनेक ठिकाणच्या शाळांत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नाही, तर अनेक ठिकाणी तो काळजीपूर्वक तयार केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. शाळा प्रशासनाचे उदासीन धोरण आणि शिक्षकांच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला. परिणामी पाल्याच्या भविष्याचा विचार करून पालकवर्गाचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे वळू लागला आणि शासकीय शाळा ओस पडू लागल्या. अतिरिक्त शिक्षकांची संख्या, तुकड्या कमी होत चालल्या. दुसरीकडे खासगी शिक्षणसंस्थांच्या योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीमुळे त्यांच्या शाळांमधील पटसंख्या वाढतच आहे. खासगी संस्थाचालक आपल्या शिक्षकांकडून काम योग्य पद्धतीने करून घेत असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खूप उंचावला. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीही शासकीय शाळांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. खासगी शाळांत अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा असून, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. एकंदरीत चित्र पाहता गैरसोयींमुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.