शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुंबईला जाऊन हीराे व्हायचेय म्हणून साेडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर ...

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर जाण्यासाठी तर टीव्हीवरील हीराे-हीराेइनचे आकर्षण, त्यांचे माेठे बंगले व राहणीमान आपणही करावे म्हणून घर साेडून जात असल्याची माहिती आहे. अशी घरून पळालेली मुले रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकात आढळत असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. अकाेल्यात एकाच घरातील तीन बहिणी, तर एका घरातील दाेघे सख्खे चुलत भाऊ पळून जात असताना अकाेला रेल्वेस्थानकावर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहेत तर काही मुलांना बसस्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांना साेपवले आहे. त्यामुळे घरातील कलह मुलांसमाेर हाेणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

सापडलेली मुले

२०१८ १५६

२०१९ १४२

२०२० १५२

२०२१ ८४

काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणाला घरातील वादाचा कंटाळा

या लहान मुलांसमाेर घरातील वाद हाेत असल्याने त्यांना याचा कंटाळा येत आहे, तर याच मुलांना टीव्हीवरील हीराे-हीराेइन तर त्यांचे बंगले व राहणीमान याचे आकर्षण हाेत असल्याने नासमज असलेली ही मुले मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. या मुलांना रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

घरातील कलहाने साेडले घर

सिंधी कॅम्प परिसरातून बेपत्ता असलेल्या मुलांची तक्रार झाल्यानंतर काही तासांतच त्याला अकाेला रेल्वेस्थानकावरून शाेधण्यात आले हाेते. या मुलाची चाैकशी केली असता घरातील कलहामुळे त्याने घर साेडल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी कुटुंबीयांना बाेलावून त्यांची समजूत घातली तर मुलगाही दिवसभर बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनाही त्यांची चूक कळली.

हिंगाेलीतील मुलगा अकाेल्यात आढळला

हिंगाेली येथील रहिवासी असलेला मुलगा अचानक घर साेडून निघून आला. नासमज असलेल्या या मुलाने बसने थेट अकाेला गाठून येथून पुढील प्रवास मुंंबईला करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले. मात्र रेल्वे पाेलिसांना या मुलाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याची चाैकशी करून मुलाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. त्यांच्यासमाेर कुटुंबातील कलह टाळणे गरजेचे आहे. या मुलांसमाेर वाद हाेणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. तसेच त्यांना मित्रत्वाची वागणूक देऊन मुलांची प्रत्येक गाेष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.

- विलास पाटील,

पाेलीस निरीक्षक, अकाेला