शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मेरे पास सिर्फ माँ है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या ...

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या फक्त वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनामुळे जिल्ह्यात वडिलांचे छत्र हरविले आणि पालक म्हणून केवळ आई असलेल्या जिल्ह्यातील ४५ बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्य लक्षात घेता, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्यांना (१८ वर्षांआतील बालकांना) मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या केवळ वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे, कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरविल्याने पालक म्हणून केवळ आई असलेल्या बालकांना कोण आणि कोणती मदत करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे १८ वर्षांआतील ७४ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचा आणि २९ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे केवळ वडिलांचे छत्र हरविल्याने पालक म्हणून आई असलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण :

बरे झालेले रुग्ण :

सध्या उपचार सुरू असलेले :

एकूण मृत्यू :

२९ बालकांची आई; ४५ बालकांच्या

वडिलांचे हरवले छत्र!

कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालकांचे छत्र हरवले आहे. त्यामध्ये ४५ बालकांनी वडिलांचे व २९ बालकांनी आईचे छत्र हरवले. त्यापैकी २६ मुले व १९ मुलींच्या वडिलांचा आणि १५ मुले व १४ मुलींच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बालसंगोपन योजनेचा मिळणार आधार?

कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार देण्यात येणार आहे. एकल पालक असलेल्या पात्र बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपयांप्रमाणे मदतीचा लाभ मिळू शकतो.

गृहचौकशीचा अहवाल

टास्क फोर्स बैठकीत ठेवणार!

कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालक गमावले. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचा आणि २९ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकल पालक असलेल्या जिल्ह्यातील ७४ बालकांची गृहचौकशी करण्यात आली असून, या चौकशीचा अहवाल जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी सांगितले.