शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात देशसेवेची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या ...

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन देशवासीयांचे रक्षण करण्याचं सौभाग्य मिळालं... याचा मला सार्थ अभिमान आहे... युवकांनी सैन्यात दाखल व्हावं, पण नोकरी म्हणून नाही, तर देश सुरक्षेसाठी, सैनिक म्हणून जगण्यासाठी, असं मत माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केलं.

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशावर अनेक संकटं आलीत, मात्र सैन्याने ताकदीने ही संकटे परतवून लावलीत. देशसेवेचे असेच काही आठवणीतले अनुभव माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने कारगिल युद्ध (ऑपरेशन विजय) आणि मुंबई येथील २६/११ आतंकवादी हल्ल्यात सैनिक म्हणून देशसेवेचा त्यांचा अनुभव व्यक्त केला. कारगिल युद्धावेळी ते राजस्थान बॉर्डरवर तैनात हाेते. येथे प्रत्यक्ष युद्धात सहभागी होता आले नसले, तरी संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी तब्बल तीन महिने डोळ्यात तेल घालून भारतीय सैन्याने बॉर्डरवर तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दिल्ली येथे एनएसजी कमांडरमध्ये कार्यरत असताना मुंबई येथील २६/११चा आतंकवादी हल्ला झाला. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे सौभाग्य मिळाले. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी नरिमन पॉइंट येथील हॉटेलवर हॅलिकॉप्टरने ड्रॉप झाल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एनएसजी कमांडरच्या तुकडीने दोन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर आम्ही ताज हॉटेलमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी ४० ते ५० लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लोकांनी गुलाबपुष्प देऊन आमचे स्वागत केले. पण या लढाईत आमचे मित्र हवलदार गजेंदर शहीद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

युवकांनो बलिदानाची मानसिकता ठेवा

तरुणाई नोकरीसाठी आर्मीमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहते, मात्र हे एक बलिदान आहे. तरुणाईने त्याकडे बलिदान म्हणून बघण्याची गरज आहे. देशाच्या रक्षणासाठी देशाचा सैनिक म्हणून जगण्याची गरज आहे. हा विचार तरुणाईच्या मनात रुजण्याची गरज आहे, तरच आपण देशाची खरी सेवा करू शकता.

- वसंत सरकटे, माजी सुभेदार मेजर, भारतीय आर्मी