शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
3
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
4
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
5
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
6
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
7
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
8
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
9
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
10
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
11
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
12
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
13
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
14
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
15
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
16
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
17
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
18
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
19
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
20
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात देशसेवेची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या ...

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन देशवासीयांचे रक्षण करण्याचं सौभाग्य मिळालं... याचा मला सार्थ अभिमान आहे... युवकांनी सैन्यात दाखल व्हावं, पण नोकरी म्हणून नाही, तर देश सुरक्षेसाठी, सैनिक म्हणून जगण्यासाठी, असं मत माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केलं.

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशावर अनेक संकटं आलीत, मात्र सैन्याने ताकदीने ही संकटे परतवून लावलीत. देशसेवेचे असेच काही आठवणीतले अनुभव माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने कारगिल युद्ध (ऑपरेशन विजय) आणि मुंबई येथील २६/११ आतंकवादी हल्ल्यात सैनिक म्हणून देशसेवेचा त्यांचा अनुभव व्यक्त केला. कारगिल युद्धावेळी ते राजस्थान बॉर्डरवर तैनात हाेते. येथे प्रत्यक्ष युद्धात सहभागी होता आले नसले, तरी संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी तब्बल तीन महिने डोळ्यात तेल घालून भारतीय सैन्याने बॉर्डरवर तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दिल्ली येथे एनएसजी कमांडरमध्ये कार्यरत असताना मुंबई येथील २६/११चा आतंकवादी हल्ला झाला. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे सौभाग्य मिळाले. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी नरिमन पॉइंट येथील हॉटेलवर हॅलिकॉप्टरने ड्रॉप झाल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एनएसजी कमांडरच्या तुकडीने दोन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर आम्ही ताज हॉटेलमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी ४० ते ५० लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लोकांनी गुलाबपुष्प देऊन आमचे स्वागत केले. पण या लढाईत आमचे मित्र हवलदार गजेंदर शहीद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

युवकांनो बलिदानाची मानसिकता ठेवा

तरुणाई नोकरीसाठी आर्मीमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहते, मात्र हे एक बलिदान आहे. तरुणाईने त्याकडे बलिदान म्हणून बघण्याची गरज आहे. देशाच्या रक्षणासाठी देशाचा सैनिक म्हणून जगण्याची गरज आहे. हा विचार तरुणाईच्या मनात रुजण्याची गरज आहे, तरच आपण देशाची खरी सेवा करू शकता.

- वसंत सरकटे, माजी सुभेदार मेजर, भारतीय आर्मी