शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात देशसेवेची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या ...

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन देशवासीयांचे रक्षण करण्याचं सौभाग्य मिळालं... याचा मला सार्थ अभिमान आहे... युवकांनी सैन्यात दाखल व्हावं, पण नोकरी म्हणून नाही, तर देश सुरक्षेसाठी, सैनिक म्हणून जगण्यासाठी, असं मत माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केलं.

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशावर अनेक संकटं आलीत, मात्र सैन्याने ताकदीने ही संकटे परतवून लावलीत. देशसेवेचे असेच काही आठवणीतले अनुभव माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने कारगिल युद्ध (ऑपरेशन विजय) आणि मुंबई येथील २६/११ आतंकवादी हल्ल्यात सैनिक म्हणून देशसेवेचा त्यांचा अनुभव व्यक्त केला. कारगिल युद्धावेळी ते राजस्थान बॉर्डरवर तैनात हाेते. येथे प्रत्यक्ष युद्धात सहभागी होता आले नसले, तरी संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी तब्बल तीन महिने डोळ्यात तेल घालून भारतीय सैन्याने बॉर्डरवर तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दिल्ली येथे एनएसजी कमांडरमध्ये कार्यरत असताना मुंबई येथील २६/११चा आतंकवादी हल्ला झाला. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे सौभाग्य मिळाले. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी नरिमन पॉइंट येथील हॉटेलवर हॅलिकॉप्टरने ड्रॉप झाल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एनएसजी कमांडरच्या तुकडीने दोन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर आम्ही ताज हॉटेलमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी ४० ते ५० लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लोकांनी गुलाबपुष्प देऊन आमचे स्वागत केले. पण या लढाईत आमचे मित्र हवलदार गजेंदर शहीद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

युवकांनो बलिदानाची मानसिकता ठेवा

तरुणाई नोकरीसाठी आर्मीमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहते, मात्र हे एक बलिदान आहे. तरुणाईने त्याकडे बलिदान म्हणून बघण्याची गरज आहे. देशाच्या रक्षणासाठी देशाचा सैनिक म्हणून जगण्याची गरज आहे. हा विचार तरुणाईच्या मनात रुजण्याची गरज आहे, तरच आपण देशाची खरी सेवा करू शकता.

- वसंत सरकटे, माजी सुभेदार मेजर, भारतीय आर्मी