शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

जलकुंभीचा वैताग; ठरावाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

अकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका काही पर्यायी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देस्थायी समिती हतबलनदी पात्रात सांडपाणी तुंबले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका काही पर्यायी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  शहरातून निघणार्‍या घाण सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडल्या जाते. नदीपात्रातून सांडपाणी वाहून जाणे अपेक्षित असताना जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा न होता घाण तुंबल्याचे पहावयास मिळते. नदी पात्रातील जलकुंभीमुळे डासांची मोठय़ा प्रमाणात पैदास वाढली आहे. मच्छरांच्या त्रासामुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, त्यांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे असताना तसे होत नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंतही निविदा प्रकाशित केली नाही. नागरिकांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास ध्यानात घेऊन महापालिकेच्या स्थायी समितीने जलकुंभी काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. स्थायी समितीच्या ठरावानुसार प्रशासनाने निविदा काढणे अपेक्षित असताना ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. 

‘स्थायी’ला ठराव घेण्याचा अधिकार नाही!मनपाच्या स्थायी समितीने जलकुंभी काढण्यासाठी मंजूर केलेल्या ठरावाला प्रशासनाने बाजूला सारले आहे. स्थायी समितीला केवळ आर्थिक धोरणासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. जलकुंभीसाठी मंजूर केलेला ठराव घेण्याचा ‘स्थायी’ला अधिकार नसल्याचा दावा प्रशासनाकडून होतो. प्रशासनाच्या दाव्यामुळे स्थायी समितीला नेमक्या कोणत्या अधिकारांतर्गत कोणत्या विषयांवर ठराव घेता येतात, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.