शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभीचा वैताग; ठरावाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

अकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका काही पर्यायी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देस्थायी समिती हतबलनदी पात्रात सांडपाणी तुंबले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका काही पर्यायी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  शहरातून निघणार्‍या घाण सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडल्या जाते. नदीपात्रातून सांडपाणी वाहून जाणे अपेक्षित असताना जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा न होता घाण तुंबल्याचे पहावयास मिळते. नदी पात्रातील जलकुंभीमुळे डासांची मोठय़ा प्रमाणात पैदास वाढली आहे. मच्छरांच्या त्रासामुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, त्यांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे असताना तसे होत नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंतही निविदा प्रकाशित केली नाही. नागरिकांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास ध्यानात घेऊन महापालिकेच्या स्थायी समितीने जलकुंभी काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. स्थायी समितीच्या ठरावानुसार प्रशासनाने निविदा काढणे अपेक्षित असताना ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. 

‘स्थायी’ला ठराव घेण्याचा अधिकार नाही!मनपाच्या स्थायी समितीने जलकुंभी काढण्यासाठी मंजूर केलेल्या ठरावाला प्रशासनाने बाजूला सारले आहे. स्थायी समितीला केवळ आर्थिक धोरणासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. जलकुंभीसाठी मंजूर केलेला ठराव घेण्याचा ‘स्थायी’ला अधिकार नसल्याचा दावा प्रशासनाकडून होतो. प्रशासनाच्या दाव्यामुळे स्थायी समितीला नेमक्या कोणत्या अधिकारांतर्गत कोणत्या विषयांवर ठराव घेता येतात, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.