शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

देवळीतील उपोषण अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने सुटले

By admin | Updated: April 21, 2017 18:41 IST

सदर उपोषण अखेर पाचव्या दिवशी बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर सुटले.

बोरगांव मंजू : जनतेच्या विविध विभागाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा, याकरिता परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी १७ एप्रिलपासून नजीकच्या देवळी येथे सामूहिक बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. सदर उपोषण अखेर पाचव्या दिवशी बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर सुटले.येथील देवानंद सदांशिव, दिलीप खरबडकार, अयाजमिया देशमुख, प्रकाश चक्रनारायण, समाधान पंडित, अंबादास वसू यांनी पातूर-नंदापूर गावातील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली पातूर-नंदापूर ते कानडी बससेवा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा, पातूर-नदापुर ते कवळा शेत रस्ता बांधकाम करणार्‍या मजुरांची मजुरी त्वरित अदा करून उर्वरित शेत रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे, अन्वी मिर्झापूर येथील घरकुलाच्या बांधकामाकरिता धनादेश अदा केल्याप्रकरणी सर्व दोषींवर प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी, देवळी येथे वन विभागाने डमी मजूर दाखवून पैसे हडपल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण तीन दिवसांपासून सुरू असूनही कुणीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे ह्यलोकमतह्णने २0 एप्रिलच्या अंकात याबाबतची बातमी ह्यविविध मागण्यांसाठी सामूहिक उपोषण सुरूच!ह्ण या शीर्षकाखाली प्रकाशित केली होती. अखेर २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बोरगाव मंजू ठाणेदार पी.के. काटकर, अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन वेले, निवासी नायब तहसीलदार वाय.आर. हातेकर, विस्तार अधिकारी आर.के. देशमुख, ग्रामसेवक विलास जाधव, तलाठी डी.यू. गावंडे, पातूर-नंदापूर भगवान गवळी यांनी संबंधित उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांच्या समस्या व प्रश्न लवकर १५ दिवसांत मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांना शरबत पाजून सामूहिक उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्ष टिना देशमुख, ज्ञानदेव शेगोकार, विद्या जवके, प्रहार संघटनेचे सिद्धार्थ सदाशिव, खासगी डॉक्टर काकड, धुळधर हे उपस्थित होते. (वार्ताहर)