शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

शेकडो वृक्षांची कत्तल, प्रकरण थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित ...

आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, शेकडो हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो हिरव्या वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आल्यावर आलेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाली, त्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली होती. परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शिरपूर व बुलडाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शहापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून मन नदी वाहत आहे. आलेगाव वनपरिक्षेत्रअंतर्गत शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावरील शेतशिवरात हिरव्या मोठ्या निंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती वनविभागाला असूनसुद्धा वनभागाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून होत आहे. शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावर असलेल्या शेतशिवारात भरदिवसा खुलेआम वृक्षतोड करून अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे वन व महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्षतोड माफियांना वन व महसूल विभागाचे अभय असल्यामुळे सर्रास वृक्षतोड सुरू आहे. शिरपूर परिसरात मोठमोठे निंबाची झाडे तोडून अवैध वाहतूक निर्धास्तपणे होत आहे. वृक्षतोड माफियांकडून सकाळीच मशीनद्वारे मोठ्या वृक्षांची कत्तल करून विल्हेवाट लावली जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षतोड झाली आहे. त्यांना तलाठीमार्फत शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर माहिती करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सतीश नालिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव

वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का?

आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत शिरपूर, खेट्री, पिंपळखुटा, उमरा, राहेर, आडगाव, मळसूर, सायवणी, सुकडी, चान्नी, चतारी, चांगेफळ आदी परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल होत आहे. परंतु आलेगाव वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.