शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शेकडो वृक्षांची कत्तल, प्रकरण थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित ...

आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, शेकडो हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो हिरव्या वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आल्यावर आलेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाली, त्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली होती. परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शिरपूर व बुलडाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शहापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून मन नदी वाहत आहे. आलेगाव वनपरिक्षेत्रअंतर्गत शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावरील शेतशिवरात हिरव्या मोठ्या निंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती वनविभागाला असूनसुद्धा वनभागाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून होत आहे. शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावर असलेल्या शेतशिवारात भरदिवसा खुलेआम वृक्षतोड करून अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे वन व महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्षतोड माफियांना वन व महसूल विभागाचे अभय असल्यामुळे सर्रास वृक्षतोड सुरू आहे. शिरपूर परिसरात मोठमोठे निंबाची झाडे तोडून अवैध वाहतूक निर्धास्तपणे होत आहे. वृक्षतोड माफियांकडून सकाळीच मशीनद्वारे मोठ्या वृक्षांची कत्तल करून विल्हेवाट लावली जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षतोड झाली आहे. त्यांना तलाठीमार्फत शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर माहिती करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सतीश नालिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव

वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का?

आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत शिरपूर, खेट्री, पिंपळखुटा, उमरा, राहेर, आडगाव, मळसूर, सायवणी, सुकडी, चान्नी, चतारी, चांगेफळ आदी परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल होत आहे. परंतु आलेगाव वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.