शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेकडो वृक्षांची कत्तल, प्रकरण थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित ...

आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, शेकडो हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो हिरव्या वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आल्यावर आलेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाली, त्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली होती. परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शिरपूर व बुलडाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शहापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून मन नदी वाहत आहे. आलेगाव वनपरिक्षेत्रअंतर्गत शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावरील शेतशिवरात हिरव्या मोठ्या निंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती वनविभागाला असूनसुद्धा वनभागाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून होत आहे. शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावर असलेल्या शेतशिवारात भरदिवसा खुलेआम वृक्षतोड करून अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे वन व महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्षतोड माफियांना वन व महसूल विभागाचे अभय असल्यामुळे सर्रास वृक्षतोड सुरू आहे. शिरपूर परिसरात मोठमोठे निंबाची झाडे तोडून अवैध वाहतूक निर्धास्तपणे होत आहे. वृक्षतोड माफियांकडून सकाळीच मशीनद्वारे मोठ्या वृक्षांची कत्तल करून विल्हेवाट लावली जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षतोड झाली आहे. त्यांना तलाठीमार्फत शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर माहिती करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सतीश नालिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव

वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का?

आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत शिरपूर, खेट्री, पिंपळखुटा, उमरा, राहेर, आडगाव, मळसूर, सायवणी, सुकडी, चान्नी, चतारी, चांगेफळ आदी परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल होत आहे. परंतु आलेगाव वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.