शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थी ताटकळत बसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:09 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी व नैदानिक चाचणी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी राबविण्यात येते. गुरुवारी झालेल्या या परीक्षेचे नियोजन नसल्याने पातूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ताटकळत बसावे लागले. पातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसला.

ठळक मुद्दे शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी व नैदानिक चाचणी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी राबविण्यात येते. गुरुवारी झालेल्या या परीक्षेचे नियोजन नसल्याने पातूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ताटकळत बसावे लागले. पातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसला.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, तर इयत्ता नववीसाठी नैदानिक चाचणी घेण्यात येते. यामध्ये भाषा, गणित आणि विज्ञान या विषयाचे पेपर महाराष्ट्रात एकाचवेळी घेण्याचा आदेश आहे. त्यानुसार सन २0१७-१८ या शैक्षणिक सत्रातील परीक्षेच्या तारखा शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. यातील पहिली पायाभूत व नैदानिक चाचणी ७ सप्टेंबर रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार या चाचण्यांचे संपूर्ण साहित्य ७ सप्टेंबरपूर्वी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. परंतु पातूरच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शाळांपर्यंत हे साहित्य गुरुवारी दुपारपर्यंत पोहोचलेच नाही, तर अनेक शिक्षकांना शिक्षक मार्गदर्शिकाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे नेमकी परीक्षा घ्यावी कशी? याबाबत अनेक शिक्षकांचा संभ्रम कायम होता. त्यामुळे अनेक शाळांना पेपर भेटूनही विद्यार्थ्यांचे पेपर कसे घ्यावे, यासंदर्भात संभ्रम असल्याने विद्यार्थ्यांना दुपारी उशिरापर्यंंत ताटकळत बसावे लागल्याची बाब समोर आली. या संदर्भात संबंधित साधन व्यक्ती व पातूरच्या गटशिक्षण अधिकार्‍यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल आऊटऑफ कव्हरेज एरिया असल्याचा संदेश मिळत असल्यामुळे त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

पेपर व परीक्षेचे साहित्य पडले बेवारस- परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी संतोष राठोड साधन व्यक्ती या कर्मचार्‍याकडे देण्यात आली होती; परंतु या कर्मचार्‍याने जि.प. मधून आणलेले संपूर्ण पेपर पातूरच्या जि. प. शाळेत बेवारस स्थितीत ठेवल्याचा आरोप होत आहे. एका वर्गखोलीत पेपर ठेवून बेवारस स्थितीत असल्याने अनेक शाळांना पेपर मिळालेच नाहीत, तर केंद्रप्रमुखांनाही पेपर व साहित्य मिळाले नसल्याने शिक्षण विभागात गुरुवारी दुपारपर्यंत गोंधळ सुरू होता. जि.प. च्या शाळेत ठेवलेले साहित्य बेवारस पडून असल्याने अनेक शिक्षकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पेपरसंच व साहित्य नेल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. - अशा नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांंना बसला. दुपारी उशिरापर्यंंत अनेक शाळांना पेपर नाही, तर कुठे मार्गदर्शिका नाहीत, असा गोंधळ सुरू होता, तर अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी झेरॉक्स काढून पेपर घेतले, तर काहींना अकोला जाऊन पेपर व संच घेऊन येण्याचा सल्ला देण्यात आला. अशा नियोजनशून्य कारभार करणार्‍या संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.