शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला ‘शत-प्रतिशत’ची घाई!

By admin | Updated: July 8, 2017 02:35 IST

शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे शरसंधान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय जनता पक्षाला ‘शत-प्रतिशत’ची घाई झाली आहे. त्यामुळेच हा पक्ष महायुतीतील घटकपक्षांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी अकोला येथे शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी अकोला येथे आलेल्या विनायकराव मेटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर दिलखुलास संवाद साधला. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाजप घटकपक्षांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका केली. भाजपाला शत-प्रतिशतची घाई झाली आहे, त्यामुळे या पक्षाचे नेते महायुतीतील छोट्या पक्षांना गृहीत धरतात. जागा वाटपांमध्ये छोट्या पक्षांवर अन्याय होत असल्यामुळे महायुतीतील छोटे पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र निवडणुका लढविताना दिसतात. गतवेळी विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडण्याचा भाजपच्या केंद्र व राज्यपातळीवरील नेतृत्वाकडून घेण्यात आला होता. या मतदारसंघातून संदीप लोड यांना एबी फॉर्मही मिळाला होता; परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे तिकीट कापून केवळ आमचाच नव्हे, तर भाजपच्या राष्ट्रीय व राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोपही यावेळी आमदार मेटे यांनी केला. पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड यांच्यासह नानासाहेब भिसे, पांडुरंग खवले, विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड रासपचे संतीश हांडे आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री सर्वांना सांभाळणारे !एकीकडे भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करीत असल्याची टीका करणाऱ्या मेटे यांनी दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वपक्षातील नेत्यांसोबतच महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यांना सांभाळून घेतात. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना ही जबाबदारी पार पाडावी लागते असे मेटे म्हणाले.स्थानिक भाजप नेत्यांनीच केला विश्वासघात!गत विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्रामसाठी बाळापूर मतदारसंघ सोडण्यात आला होता. या मतदारसंघातून शिवसंग्रामच्या संदीप पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र एबी फॉर्ममध्ये खोडखाड करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे नाव टाकले. या नेत्यांनी आमचाच नव्हे, तर तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका यावेळी विनायकराव मेटे यांनी केली.बाळापूरवरचा हक्क सोडणार नाही!विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीत कायम राहण्याचे स्पष्ट करतानाच, अकोला जिल्ह्यातून एक तरी आमदार शिवसंग्रामचा नक्कीच निवडून आणणार, असा विश्वास आ. मेटे यांनी यावेळी व्यक्त केला. बाळापूरवरचा हक्क शिवसंग्राम कदापिही सोडणार नाही. ंमहायुती होवो अगन ना होवो, हा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सुटो अथवा ना सुटो, त्या ठिकाणी आगामी निवडणुकीत शिवसंग्रामचा उमेदवार उभा राहीलच. कोणत्याही ‘सोम्या-गोम्या’चे आम्ही ऐकणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.