शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील शेकडो लघुप्रकल्प कोरडे!

By admin | Updated: January 27, 2016 23:24 IST

भीषण पाणीटंचाईचे संकेत; प्रशासनाचा कृती आराखडा कागदावरच.

सुनील काकडे/वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात संपूर्ण विदर्भात अल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. अशातच रब्बी हंगामातील पिकांसाठी झालेला उपसा आणि जमिनीची होणारी धूप या कारणांमुळे सद्यस्थितीत अमरावती विभागातील ४२८ लघुसिंचन प्रकल्पांपैकी सुमारे २५0 प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांची पाणी पातळीदेखील झपाट्याने खालावत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे. सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील ४२८ लघुप्रकल्पांमध्ये केवळ २0 ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील १0७ पैकी तब्बल ६0 प्रकल्प कोरडे पडले असून, उर्वरित चार जिल्ह्यांमध्येही भयावह स्थिती उद्भवली आहे. हातपंप, कूपनलिका, विहिरी हे जलस्रोतदेखील कोरडे पडल्याने जनमानसासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा कागदोपत्री तयार करण्यापलीकडे कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. वाशिम जिल्ह्यात साडेपाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा कृती आराखडा तयार आहे; पण ७९३ पैकी ५६0 गावे टंचाईग्रस्त असताना एकाही गावात अद्याप साधे टँकरदेखील सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. जलयुक्त शिवारचा फुगा हवेतच विरला!मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविले. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधी लिटर पाण्याची साठवण झाल्याचा आव प्रशासकीय पातळीवरून आणण्यात आला; मात्र सध्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईने राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

अख्खा मराठवाडा तहानला!महाराष्ट्रातील इतर विभागांच्या तुलनेत यंदा मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचे चटके जास्त सोसावे लागत आहेत. मराठवाड्यातील ७२८ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस उणापुरा दोन ते अडीच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५00 पेक्षा जास्त प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, उस्मानाबादमधील निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि नांदेड जिल्ह्यातील मनार या पाच प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहोचली असून, जायकवाडी, पूर्णा येलदरी, पूर्णा सिद्धेश्‍वर, ऊध्र्व पैनगंगा, विष्णुपुरी, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प अल्पावधीतच कोरडे पडतील, अशी भीती वर्तविली जात आहे.