शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विशेष रेल्वेच्या नावाखाली आणखी किती दिवस चालणार प्रवाशांची लूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ...

अकोला : कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येत असल्याने, महागडे आरक्षित तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करणे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे ठरत आहे. कोरोनाच्या नावाखाली विशेष रेल्वे चालवून रेल्वे प्रशासन आणखी किती दिवस प्रवाशांची लूट चालवणार आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे. देशभरात सुरू असलेल्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही. शिवाय या गाड्यांमध्ये दैनंदिन पास, दिव्यांग व इतर सवलतीही बंद आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह सामान्य जनता जास्तीचे भाडे भरून मेटाकुटीस आली आहे.

अकोला स्थानकावरून जातात या रेल्वे

अहमदाबाद-हावडा

अमरावती-मुंबई

कोल्हापूर-गोंदिया

हावडा-मुंबई

नांदेड-श्रीगंगानगर

आरक्षित तिकीट नको रे बाबा

विशेष गाड्यांमध्ये सामान्य डबे नसल्याने केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करावा लागतो. जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण वेटिंगवर असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वेळेवर प्रवास करावयाचा झाल्यास आरक्षण मिळत नाही. शिवाय आरक्षणाचे तिकीट दरही जास्त आहेत. त्यामुळे रेल्वेने आता आरक्षणाची सक्ती न करता जनरल तिकीट सुरू करावे, अशा भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

असा आहे फरक

अकोला ते मुंबई प्रवासासाठी साधारण डब्यात प्रवास करावयाचा असल्यास पूर्वी केवळ २०० रुपये लागायचे. आता आरक्षित तिकीट काढावे लागत असल्याने तब्बल ३७० रुपये मोजावे लागतात. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये तर मुंबईसाठी ४१५ रुपयांचे तिकीट काढावे लागते. नागपूरसाठी पूर्वी जनरलमध्ये प्रवास केल्यास ११५ रुपये मोजावे लागत होते. आता जवळपास २०० रुपये खर्च करावे लागतात.

\Iविशेष रेल्वेमध्ये आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षित तिकिटाचे दर जास्त असतात. शिवाय दैनंदिन पास व इतर सवलतीही बंद आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.\I

\I- मनोहर कंठाळे, अकोला\I

\Iपूर्वी रेल्वेचा प्रवास हा स्वस्त बसच्या तुलनेत स्वस्त होता. आता सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये जनरल सीटिंग ही कॅटेगिरीच नसल्यामुळे आरक्षित जागांसाठी २० ते २५ रुपये जास्त आकारले जात आहेत. दररोज प्रवास करणाऱ्यांना हे परवडणारे नाही.\I

\I- केशवराज खातखेडे, अकोला\I