शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेच्या नावाखाली आणखी किती दिवस चालणार प्रवाशांची लूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ...

अकोला : कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येत असल्याने, महागडे आरक्षित तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करणे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे ठरत आहे. कोरोनाच्या नावाखाली विशेष रेल्वे चालवून रेल्वे प्रशासन आणखी किती दिवस प्रवाशांची लूट चालवणार आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे. देशभरात सुरू असलेल्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही. शिवाय या गाड्यांमध्ये दैनंदिन पास, दिव्यांग व इतर सवलतीही बंद आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह सामान्य जनता जास्तीचे भाडे भरून मेटाकुटीस आली आहे.

अकोला स्थानकावरून जातात या रेल्वे

अहमदाबाद-हावडा

अमरावती-मुंबई

कोल्हापूर-गोंदिया

हावडा-मुंबई

नांदेड-श्रीगंगानगर

आरक्षित तिकीट नको रे बाबा

विशेष गाड्यांमध्ये सामान्य डबे नसल्याने केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करावा लागतो. जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण वेटिंगवर असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वेळेवर प्रवास करावयाचा झाल्यास आरक्षण मिळत नाही. शिवाय आरक्षणाचे तिकीट दरही जास्त आहेत. त्यामुळे रेल्वेने आता आरक्षणाची सक्ती न करता जनरल तिकीट सुरू करावे, अशा भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

असा आहे फरक

अकोला ते मुंबई प्रवासासाठी साधारण डब्यात प्रवास करावयाचा असल्यास पूर्वी केवळ २०० रुपये लागायचे. आता आरक्षित तिकीट काढावे लागत असल्याने तब्बल ३७० रुपये मोजावे लागतात. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये तर मुंबईसाठी ४१५ रुपयांचे तिकीट काढावे लागते. नागपूरसाठी पूर्वी जनरलमध्ये प्रवास केल्यास ११५ रुपये मोजावे लागत होते. आता जवळपास २०० रुपये खर्च करावे लागतात.

\Iविशेष रेल्वेमध्ये आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षित तिकिटाचे दर जास्त असतात. शिवाय दैनंदिन पास व इतर सवलतीही बंद आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.\I

\I- मनोहर कंठाळे, अकोला\I

\Iपूर्वी रेल्वेचा प्रवास हा स्वस्त बसच्या तुलनेत स्वस्त होता. आता सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये जनरल सीटिंग ही कॅटेगिरीच नसल्यामुळे आरक्षित जागांसाठी २० ते २५ रुपये जास्त आकारले जात आहेत. दररोज प्रवास करणाऱ्यांना हे परवडणारे नाही.\I

\I- केशवराज खातखेडे, अकोला\I