शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त केलेच कसे?

By admin | Updated: November 15, 2014 23:48 IST

पुणे, नाशिकनंतर इतर बाजार समित्यांचे न्यायालयात जाण्याचे संकेत.

अकोला : राज्यातील शंभराच्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील अशासकीय प्रशासक मंडळ शासनाने बरखास्त केले असून, या पद्धतीने प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात येत नसल्याने, पुणे, नाशिकनंतर राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी चालविली आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत एक वर्षापूर्वीच संपली. काही बाजार समित्यांवरील संचालक मंडळाचा कार्यकाळ नुकताच सं पला. या बाजार समित्या शासनाने ११ नोव्हेंबर रोजी बरखास्त केल्या. यात पश्‍चिम विदर्भातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. विदर्भात खरीप हंगाम सुरू असून, शेतकर्‍यांनी शेतमाल बाजारात आणण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. संचालक मंडळाला शेतकर्‍यांच्या समस्यांची माहिती असल्याने, या समस्या सोडविण्यास मदत होते; तथापि शासनाने याची कोणतीही जाणीव न ठेवता बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन राज्य शासनाने हाच धागा पकडून राज्यातील या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळ नेमले होते; परंतु अशासकीय प्रशासक मंडळ बर खास्त करण्याची नियमात तरतुद नसताना, राज्य शासनाने मंडळ बरखास्त करू न शेतकर्‍यांची गैरसोय केल्याचा आरोप या मंडळाच्या सदस्यांनी सुरू केला आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने न्यायालयात धाव घेतली असून, या बाजार समितीवरील मंडळ जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पश्‍चिम विदर्भातील बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळानेदे खील न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

* निवडणूक कार्यक्रम लावा

        गतवर्षीची अतवृष्टी आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लागल्याने बाजार समित्यांच्या निवडणुका सहकार विभागाने पुढे ढकलल्या. यातील काही बाजार समित्यांवर आधीच्या सरकारने अशासकीय प्रशासक मंडळ नेमले होते. या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची मागणी या समित्यांच्या संचालकांची आहे. शासनाचे तसे आदेश असले तरी निवडणुकांना विलंब होत आहे.