शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

दहावी, बारावीत ३0 टक्के विद्यार्थी वाढलेच कसे?

By admin | Updated: January 8, 2017 02:25 IST

संजय गणोरकर यांचा विजुक्टाच्या अधिवेशनात दिला आहेर.

शेगाव(जि.बुलडाणा), दि. ७- : सप्टेंबर अखेर पटपडताळणी झाल्यानंतरही दहावीत २८ आणि बारावीत ३६ टक्के विद्यार्थी प्रवेश संख्या वाढलीच कशी, यामागे काही काळेबेरे तर नाही ना, असा सवाल करत नागपूर, अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी विजुक्टाच्या सदस्यांना घरचा आहेर दिला.शेगाव येथील माउली इंस्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी परिसरात विजुक्टाच्या शिक्षण परिषदेचे उद्घाटन गणोरकर यांच्या हस्ते पार पडले. परिषदेच्या प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी विजुक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे होते. यावेळी मंचावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांंची हजेरी निश्‍चिती ३0 सप्टेंबर रोजी करून ती युडायस प्रणालीत नोंद केली जाते. त्यानंतरचे सर्व प्रवेश शिक्षणाधिकार्‍यांच्या मंजुरीने होतात. चालू वर्षात सप्टेंबरनंतर झालेले प्रवेश पाहता विद्यार्थ्यांंची संख्या प्रचंड वाढलेली दिसत आहे. हा प्रकार संशयास्पद आहे, याचा विचार प्राध्यापकांनी करावा, असेही गणोरकर म्हणाले.अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक सुरेश कुळकर्णी यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाच्या समस्या अनेक आहेत. त्याची जाणीव या निमित्ताने शासनाला होणार असल्याचे सांगितले. मंचावर बुलडाण्याचे शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, प्रा. अविनाश तळेकर, प्रा. डी.बी.जांभरुणकर, प्रा. साहेबराव मांजरे, प्रा. भालचंद्र केंढे, प्रा. शशिनिवास मिश्रा, प्रा. अरविंद मंगळे, प्रा. संजय देशमुख, प्रा. सीताराम चैतवार, प्रा. रमेश खाडे, प्रा. ज्ञानेश्‍वर डोंगरे, प्रा. प्रवीण ढोणे उपस्थित होते. संचालन प्रा. अनिल काळे यांनी केले.- विदर्भातील राजकीय संपत्तीचा लाभ घ्या!विदर्भ साधन संपत्तीने भरपूर आहे. त्यात आता राजकीय संपत्तीची भर पडली आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातच आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी मातृसंस्थाही विदर्भातच आहे, त्या सर्वांचा लाभ मागण्या मंजूर करण्यासाठी व्हावा, असा सल्ला राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणिस संजय शिंदे यांनी दिला. - 'सेल्फी'चे तेवढे पाहा!येत्या काळात शासनाकडून शिक्षकांना विद्यार्थ्यांसह सेल्फी पाठवून हजेरी नोंदवण्याचा घाट घातला जाणार आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांंच्या पिढय़ा घडवणार्‍या शिक्षकांवर अविश्‍वास दाखवण्यासारखा आहे. ह्यत्याह्ण शासन निर्णयाचे काहीतरी करा, अशी मागणी यावेळी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. शत्रुघ्न बिरकड यांनी केली. - बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाचे चुकीचे धोरणअस्तित्वात असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी स्वयंअर्थसहाय्यित शाळांना प्रोत्साहन दिले जात आहे. शासनाचे हे धोरण चुकीचे असून, यामुळे बहुजन विद्यार्थ्यांंचा घात होणार आहे. राज्याने सक्तीचा शिक्षण कायदा केला. त्यानुसार ६ ते १८ वयोगटासाठी तो लागू करावा, सर्वांंना मोफत आणि गुणवत्तेचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती शासनाने घेतलीच पाहिजे, असे विजुक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी सांगितले.