शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मित्राला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

एकूण विद्यार्थी संख्या दहावीचे विद्यार्थी २५६३३ बारावीचे विद्यार्थी २३२४० पास झालेले विद्यार्थी दहावीचे २५६३१ बारावीचे २३०७० निकालावर नाराज असलेले ...

एकूण विद्यार्थी संख्या

दहावीचे विद्यार्थी २५६३३

बारावीचे विद्यार्थी २३२४०

पास झालेले विद्यार्थी

दहावीचे २५६३१

बारावीचे २३०७०

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

दरवर्षी माझ्या मुलाचा निकाल उत्तम लागतो. त्याला आतापर्यंत प्रत्येक इयत्तेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळत आले. दहावीची परीक्षा झाली असती तर त्यातही अपेक्षेनुरूप गुण मिळाले असते; मात्र तो शिकत असलेल्या शाळेने दिलेले गुण फारच कमी आहेत. त्यामुळे नाराज झालो.

- देवेंद्र इंगळे

यंदा परीक्षा झाल्या नाहीत. ऑनलाइनमुळे अडचणी येत आहेत. पुढच्या शिक्षणासाठी हे दहावीचे वर्ष महत्त्वाचे म्हणून ओळखले जाते. शाळेतील काही शिक्षकांनी मात्र भेदभाव करून मुलाला हेतुपुरस्सर कमी गुण दिले, त्यांची कुवत नाही, त्यांना परीक्षेत अधिक गुण मिळाले. हा एकप्रकारे अन्याय आहे.

- राजेश जैन

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही!

कोरोना संकटामुळे दहावी, बारावीची परीक्षा झालीच नाही. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

दरम्यान परीक्षा न होताच विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. आता त्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची कुठलीच सोय नसल्याने हुशार व होतकरु विद्यार्थी, त्यांच्या पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा झालीच नाही; तर अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या आधारे दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.

निकालाची एकूण टक्केवारी जोरदार आहे; मात्र मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे? असा प्रश्न अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित करीत आहेत.

विद्यार्थी म्हणतात...

वर्गातील हुशार मुलांपैकी मी एक आहे. दहावीच्या परीक्षेची कसून तयारी केली होती; मात्र कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. जाहीर झालेल्या निकालात शाळेकडून देण्यात आलेले गुण तुलनेने खूपच कमी आहेत. जे माझे मित्र हुशार नव्हते, त्यांना माझ्यापेक्षा अधिक गुण मिळाले.

- भावेश पंडित

मी इयत्ता आठवीपासूनच दहावीच्या परीक्षेत वर्गात सर्वाधिक गुण मिळवायचे, असा निर्धार केला होता. त्यानुसार नियोजन करून खूप अभ्यासदेखील केला; मात्र कोरोनामुळे दहावीची परीक्षाच झाली नाही. शाळेने जाहीर केलेल्या निकालात हुशार नसलेल्या मित्रांपेक्षा मला कमी गुण देण्यात आले.

- दीपक नेमाने