शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

मुख्यालयी राहाल तरच घरभाडे!

By admin | Updated: October 10, 2016 03:19 IST

न्यायालयाचे आदेश; कर्मचा-यांना भत्त्यावर सोडावे लागणार पाणी.

अकोला, दि. 0९- ग्रामीण भागात कार्यरत असलेला कोणताही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यास त्याला घरभाडे मिळणे दुरापास्त होणार आहे. घरभाडे भत्ता मिळण्यासाठी कर्मचार्‍याला मुख्यालयीच राहावे लागणार, असा आदेश वित्त विभागाने शनिवारी दिला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसह विविध विभागांच्या शेकडो कर्मचार्‍यांना त्या भत्त्यावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. ग्रामीण भागात मुख्यालयी राहणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना वित्त विभागाने १९८४ पासून घरभाडे भत्ता सुरू केला. त्यामध्ये हा भत्ता मिळण्यासाठी पात्र कर्मचार्‍यांची अटही ठरलेली आहे; मात्र त्यानंतर १९८८ मध्ये ती अट काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर २00८ मध्ये पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील, तर त्यांचा घरभाडे भत्ता, वेतनवाढ रोखण्यासोबतच शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या या परिपत्रकास जळगाव येथील राज्य प्राथमिक शिक्षक संघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने परिपत्रकामुळे घरभाडे भत्ता रोखून ठेवला असल्यास तो तत्काळ अदा करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानुसार शासनाने आता नव्याने आदेश देत १९८८ मध्ये काढून टाकलेली १९८४ ची अट पुन्हा अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश १ नोव्हेंबर २0१६ पासून लागू होणार आहेत. ग्रामविकास, महसूल, कृषीच्या कर्मचार्‍यांना अँलर्जीजि. प.च्या विविध विभागांचे कर्मचारी ग्रामीण भागात नियुक्त आहेत; मात्र त्यापैकी शेकडो कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नाहीत. त्यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविकांचा समावेश आहे.शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करावीच लागेल त्याबाबत उद्या सोमवारी सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती घेऊन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी निर्देश दिले जातील.- अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.