खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ येथे पावसामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे; मात्र असे असतानाही दोन दिवस उलटूनही अद्यापपर्यंत पंचनामा केला नसल्याचा प्रकार घडला आहे.
चांगेफळ येथील नर्बदा दुर्यधन मेहेंगे घरात झोपलेल्या असताना मंगळवारी १३ जुलै रोजीच्या मध्यरात्री परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अचानक घर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी घडली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पावसामुळे दगड-मातीच्या भिंतीमध्ये पाणी मुरल्याने घर कोसळल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही गतवर्षी याच महिलेचे घर कोसळले होते; पंचनामाही करण्यात आला होता, परंतु शासनाकडून आतापर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. या वर्षीसुद्धा घर कोसळल्याने महिलेचा संसार पुन्हा उघड्यावर आला आहे. यंदा दोन दिवस उलटूनही पंचनामा केला नसल्याचे समोर आले आहे.
-------------------------------------
पावसामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे. दोन दिवस उलटूनही पंचनामा करण्यासाठी कुणीच फिरकले नाही. मागच्या वर्षीसुद्धा घर कोसळले होते, परंतु आतापर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. मागील वर्षी घर कोसळल्याने व्याजाने पैसे घेऊन घर बांधले होते. घर कोसळल्याने पुन्हा संसार उघड्यावर आला आहे.
-नर्बदा दुर्यधन मेहेंगे, महिला, चांगेफळ
150721\4449img-20210714-wa0051.jpg~150721\4449img-20210714-wa0051.jpg
photo~photo