शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

फळबागांचे अतोनात नुकसान

By admin | Updated: April 15, 2015 01:40 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल ; केळी, आंबा, पपई, सत्रा, डाळिंब पिकांना फटका.

अकोला: जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. केळी, आंबा, संत्रा, पपई, टरबूज, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले. गतवर्षी मार्च महिन्यात गारपिटीचा फटका फळबागांना बसला होता. त्यानंतर अल्प आणि अनियमित पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकं समाधानकारक झाली नाहीत. कपाशी, सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांकडे वळला. मात्र, अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये गारपीटही झाली. बाश्रीटाकळी तालुक्यातील राजंदा शिवारात आंबा पिकांचे नुकसान झाले. पुनोती, निंबी वडगाव येथे डाळिंबाची झाडे उन्मळून पडली. सिंदखेड मोरेश्‍वर येथे वेलावर असलेल्या टरबुजाचे नुकसान झाले. ढेमशी पिकेही उद्ध्वस्त झाली. पुनोतीमध्ये डाळिंब पिकाचे नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे टरबूज, केळी, पपई पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसाचा फटका पातूर तालुक्यालाही बसला. तालुक्यातील चान्नी-चतारी, मळसूर, चांगेफळ, पिंपळखुटा, सायवणी परिसरातील आंबा, लिंबू, संत्रा पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातील बाभूळगाव परिसरातील लिंबू व आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची सर्व्हे करण्यात येत आहे. कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्व्हे करीत आहेत. मात्र, पावसामुळे सर्व्हे करण्यात व्यत्यय येत आहे. तसेच सर्वेक्षणातील आकडेवारीही बदलत आहे.

असे आहे फळांचे क्षेत्र

फळे                       क्षेत्र

संत्रा                    ३ हजार १५0 हेक्टर

लिंबू                    २ हजार ३00 हेक्टर

मोसंबी                             १५ हेक्टर

पेरू                                  १५२ हेक्टर

डाळिंब                             २५0 हेक्टर

चिकू                                  ७५ हेक्टर

सीताफळ                            ७५ हेक्टर

आवळा                               ९0 हेक्टर

आंबा                                  ६२५ हेक्टर