शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात १,२१३ हेक्टर क्षेत्रावर बागायती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, पारंपरिक पिकाला फाटा देत ...

मूर्तिजापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकरी बागायतीकडे वळले असून, यंदा तालुक्यात १,२१३ हेक्टर क्षेत्रावर बागायती शेती असून, यामध्ये फळबाग, भाजीपाला वर्गीय पिकांची पेरणी केली आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा व कांदा याप्रमुख पिकांची पेरणी सुरू असून, यंदा हरभऱ्याचे क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे.

खरिप हंगातील झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरून निघण्याची शेतकऱ्यांना आशा असली तरी असले तरी तूर पिकावर परिपक्व होण्याआधीच एकाएकी अज्ञात रोगाचे संकट आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही तद्वतच हरभरा पीक हातात यायचे आहे.

यंदा सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात होता. पैशांची जुळवाजुळव करून यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी सुरू केली. परतीच्या पावसामुळे पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करून हरभऱ्याची पेरणी केल्याची चित्र आहे. रब्बी हंगामात यंदा २३ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सद्य:स्थितीत शेतात रब्बी हंगामातील पिके डोलत असल्याचे चित्र आहे. (फोटो)

---------------

वन्यप्राण्यांचा हैदोस

तालुक्यातील रब्बी पेरणी आटोपली असून, पिके शेतात डोलू लागली आहे. रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पिकात शिरून नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

--------------------------------------