शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

मूर्तिजापूर तालुक्यात १,२१३ हेक्टर क्षेत्रावर बागायती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, पारंपरिक पिकाला फाटा देत ...

मूर्तिजापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकरी बागायतीकडे वळले असून, यंदा तालुक्यात १,२१३ हेक्टर क्षेत्रावर बागायती शेती असून, यामध्ये फळबाग, भाजीपाला वर्गीय पिकांची पेरणी केली आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा व कांदा याप्रमुख पिकांची पेरणी सुरू असून, यंदा हरभऱ्याचे क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे.

खरिप हंगातील झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरून निघण्याची शेतकऱ्यांना आशा असली तरी असले तरी तूर पिकावर परिपक्व होण्याआधीच एकाएकी अज्ञात रोगाचे संकट आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही तद्वतच हरभरा पीक हातात यायचे आहे.

यंदा सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात होता. पैशांची जुळवाजुळव करून यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी सुरू केली. परतीच्या पावसामुळे पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करून हरभऱ्याची पेरणी केल्याची चित्र आहे. रब्बी हंगामात यंदा २३ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सद्य:स्थितीत शेतात रब्बी हंगामातील पिके डोलत असल्याचे चित्र आहे. (फोटो)

---------------

वन्यप्राण्यांचा हैदोस

तालुक्यातील रब्बी पेरणी आटोपली असून, पिके शेतात डोलू लागली आहे. रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पिकात शिरून नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

--------------------------------------