शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात घरांची पडझड, तसेच ...

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात घरांची पडझड, तसेच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नदी व नाल्याकाठची जमीन पुरामुळे खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाच्या २४ जुलैच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये २ लाख २४ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु पिकांसह शेतीच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने पिकांसह शेतजमीन नुकसानीच्या भरपाईची मदत शासनाकडून केव्हा जाहीर होणार आणि नुकसानीची मदत हेक्टरी किती मिळणार, याबाबतची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

प्राथमिक अहवालानुसार अमरावती

विभागात असे आहे पिकांचे नुकसान !

जिल्हा क्षेत्र ( हेक्टर)

अकोला ५४०००

अमरावती १७६७४

यवतमाळ ९५९९

वाशिम ३१३३

बुलडाणा १७५

........................................................

एकूण ८४५८१

नुकसानीचे पंचनामे सुरू !

अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे, तसेच खरडून गेलेल्या शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पिकांसह शेतीच्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

२४ जुलै रोजीच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ८४ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिके व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पिकांसह शेतीच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.