शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांना मदतीची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, ...

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे करून, जिल्ह्यातील ७२ हजार ४७५ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ५१ कोटी ५७ लाख ४८ हजार रुपये मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतनिधीतून २४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त उर्वरित ३४ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेला २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे मदतनिधी केव्हा प्राप्त होणार आणि पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार २१ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

मदत वाटपाचे असे आहे वास्तव!

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी: ७२,४७५

मदत निधीची एकूण मागणी : ५१ कोटी ३८ लाख ६८ हजार रुपये.

प्राप्त मदतनिधी : २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपये.

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी: ३८ हजार ४५४

खात्यात जमा केलेली रक्कम : २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपये.

मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी: ३४ हजार ०२१

अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त मदतनिधीतून ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

संजय खडसे

निवासी उप-जिल्हाधिकारी.