शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांना मदतीची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, ...

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे करून, जिल्ह्यातील ७२ हजार ४७५ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ५१ कोटी ५७ लाख ४८ हजार रुपये मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतनिधीतून २४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त उर्वरित ३४ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेला २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे मदतनिधी केव्हा प्राप्त होणार आणि पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार २१ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

मदत वाटपाचे असे आहे वास्तव!

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी: ७२,४७५

मदत निधीची एकूण मागणी : ५१ कोटी ३८ लाख ६८ हजार रुपये.

प्राप्त मदतनिधी : २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपये.

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी: ३८ हजार ४५४

खात्यात जमा केलेली रक्कम : २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपये.

मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी: ३४ हजार ०२१

अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त मदतनिधीतून ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

संजय खडसे

निवासी उप-जिल्हाधिकारी.