शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

वर्षभरापासून घरातच, मुलेही कंटाळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST

अकाेला : मागील मार्च महिन्यात काेराेनाचा शिरकाव झाला अन् तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच ...

अकाेला : मागील मार्च महिन्यात काेराेनाचा शिरकाव झाला अन् तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लाॅकडाऊन झाली असून, काेराेनाच्या भीतीने पालकही मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. यामुळे मुलांमध्ये अनेक बदल जाणवत आहेत. विशेषत: मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने शाळा बंद करण्यात आल्या. त्यांनतर माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु, पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी एक वर्षापासून मुले घरात कोंडली आहेत. मुक्तपणे मैदानावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल आणि टीव्ही व्यतिरिक्त मनोरंजनाचे साधन शिल्लक नाही. घराबाहेर पडल्यास पालकांकडून मज्जाव आहे. एकाच ठिकाणी बसून मुले बोअर झाली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांची चिंता सतावत आहे. आपल्या मुलांचा तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी कराव्यात. तसेच छोटे-मोठे खेळ खेळावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती

कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मुलांना घरीच राहावे लागत आहे. टीव्ही व मोबाईलवरच वेळ घालविणे सुरू आहे. मित्र, सवंगडी भेटत नसल्याने मुलांचे मैदानी खेळ खेळणेच बंद झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

........................................................