शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालवाहूची-प्रवासी वाहनाला धडक; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

पातूर: अकोला-पातूर मार्गावर चिखलगावनजीक मालवाहूने प्रवासी वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना शनिवार, दि. ...

पातूर: अकोला-पातूर मार्गावर चिखलगावनजीक मालवाहूने प्रवासी वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना शनिवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तीनही मृतक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. चालक संजय निवृत्ती राऊत (४५) (रा.मुंगळा, ता. मालेगाव जि. वाशिम), लक्ष्मी रामभाऊ वंजारे (६५), बाळू बळीराम कुऱ्हे (३५) (दोन्ही राहणार कळंबेश्वर ता. मालेगाव, जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अकोला-पातूर मार्गाने प्रवासी वाहन क्र.(एमएच ३७ ५३८१) प्रवासी घेऊन पातूरकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक (एमएच३० एल २९९६)ने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, प्रवाशी वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमीमध्ये गायत्री ज्ञानेश्वर वंजारे या ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच चिखलगाववासीयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रवाना करण्यासाठी मदत केली. अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती होताच पातूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली.