शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

देशाच्या सर्वांगीण प्रगतीत हिंदीचे अमूल्य योगदान

By admin | Updated: September 14, 2014 01:47 IST

हिंदी दिवसाच्या पूर्वसंध्येला हिंदी साहित्यिकांचे मुक्त चिंतन

अकोला : हिंदी ही राज्यघटनेनुसार आमची राजभाष आहे. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न होत आहेत; परंतु काही मूठभर लोकांच्या विरोधामुळे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही हिंदीला तो दर्जा मिळू शकला नाही. हिंदी भाषेचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीत अमूल्य योगदान आहे. हे लक्षात घेऊनच हिंदीला राष्ट्रभाषा बनविणे योग्य ठरेल, असे मत अकोल्यातील हिंदीच्या दिग्गज साहित्यिकांनी शनिवारी व्यक्त केले. ह्यलोकमतह्ण कार्यालयात हिंदी दिवसाच्या पूर्वसंध्येला शनिवारी ह्यभारत की उन्नती मे हिंदी का योगदानह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत हिंदी साहित्यिक डॉ. मनि खेडेकर, डॉ. रामप्रकाश वर्मा, कवी घनश्याम अग्रवाल, अशोक नेमा, डॉ. प्रमोद शुक्ला, महेश शुक्ला व डॉ. सुरेश केशवानी सहभागी झाले होते. हिंदी स्वातंत्र्य चळवळीचीदेखील भाषा होती. राष्ट्रीय एकात्मता आणि व्यवहाराची भाषा म्हणूनदेखील हिंदी रुढ आहे. देशाचा बहुमुखी विकास हिंदी भाषेतूनच झाला. अशा परिस्थितीत हिंदीला विरोध करणे चुकीचे आहे. राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळणे दूर नाही, असे वक्त्यांनी सांगितले. आधुनिक माध्यमांमध्येदेखील हिंदीचा वापर अधिक करता येऊ शकतो. संगणक, मोबाईल या माध्यमातून हिंदीचा प्रचार आणि प्रसार करता येऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी अपेक्षादेखील वक्त्यांनी व्यक्त केली. हिंदी भाषा पूर्वी होती, आजही आहे आणि भविष्यातदेखील तिचे अस्तित्व राहील, यात कुठलीही शंका नाही, असे सांगताना या वक्त्यांनी सर्वांनी मिळून हिंदीचे जतन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.