शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महामार्गाचे काम अपूर्ण; अनेकांच्या घरांत शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST

हैदराबाद ते इंदौर या राष्ट्रीय महामार्गाचे पातूर ते पारस फाट्यापर्यंत रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी झाले आहे. ...

हैदराबाद ते इंदौर या राष्ट्रीय महामार्गाचे पातूर ते पारस फाट्यापर्यंत रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी झाले आहे. या महामार्गाचे काम करताना अनेक मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे; मात्र विद्युत खांब जैसे थे आहेत. दुसरीकडे संबंधित कंत्राटदाराने हलगर्जी करीत महामार्गाच्या दुतर्फा भराव म्हणून पिवळी माती टाकल्याने अनेक वाहने घसरून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने अकोला नाका परिसरातील नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले होते. याबाबत अकोला नाका परिसरातील नागरिकांनी आ. नितीन देशमुख यांना माहिती देऊन नाल्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

--------------------

शेतात साचले पाणी

महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे महामार्गानजीक असलेल्या अनेक शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन महामार्गाच्या नाल्यांचे काम करण्याची मागणी होत आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे.