शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

महामार्गावरील बसथांबे ठरताहेत मृत्यूचे प्रवेशद्वार!

By admin | Updated: December 3, 2014 01:08 IST

गावांसमोरील प्रवासी निवारे बनले शोभेच्या भिंती.

नितीन गव्हाळे / अकोलाअकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व जिल्ह्यातील राज्य मार्गांंवर रात्रंदिवस वाहने धावतात. कोणाचेही नियंत्रण नसल्याने महामार्गांंवरील वाहतूक बेताल झाली आहे. अशातच गावांजवळील बसथांब्यांवर किंवा रस्त्याच्या कडेला बस-ऑटोरिक्षांची वाट पाहणारे प्रवासी जीव धोक्यात घालून उभे असतात. अलीकडे बसथांब्यांजवळ, गावाजवळून जाणार्‍या महामार्गांंवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच महामार्ग व राज्य मार्गांंवरील बसथांबे प्रवाशांसाठी मृत्यूचे प्रवेशद्वार बनले आहेत. ह्यलोकमतह्ण चमूने मंगळवारी दुपारी व्याळा ते कुरणखेडपर्यंंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत शासन किती निष्काळजी आहे, हेच दिसून आले. शहरातून, गावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांंवर शेकडो ठिकाणी बसथांबे आहेत. दररोज हजारो प्रवासी बस व इतर वाहनांची वाट पाहत विविध ठिकाणच्या बसथांब्यांवर थांबतात. या थांब्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवासी उभे असतात. दरम्यान, या प्रवाशांच्या जवळून अनेक जड वाहने, ट्रॅव्हल्स, ट्रक, कंटेनरसारखी वाहने भरधाव निघून जातात. अशा वाहनांनी प्रवाशांना धडक देऊन जखमी केल्याच्या किंवा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. १६ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हय़ातील पारगाव येथे बसची वाट पाहत असलेल्या आठ प्रवाशांना एका कंटेनरने चिरडल्याने आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेसारख्याच अकोला जिल्हय़ातही अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत; परंतु या घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. तथापि. भविष्यात बसथांब्यांवरसुद्धा पारगावच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.