शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील बसथांबे ठरताहेत मृत्यूचे प्रवेशद्वार!

By admin | Updated: December 3, 2014 01:08 IST

गावांसमोरील प्रवासी निवारे बनले शोभेच्या भिंती.

नितीन गव्हाळे / अकोलाअकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व जिल्ह्यातील राज्य मार्गांंवर रात्रंदिवस वाहने धावतात. कोणाचेही नियंत्रण नसल्याने महामार्गांंवरील वाहतूक बेताल झाली आहे. अशातच गावांजवळील बसथांब्यांवर किंवा रस्त्याच्या कडेला बस-ऑटोरिक्षांची वाट पाहणारे प्रवासी जीव धोक्यात घालून उभे असतात. अलीकडे बसथांब्यांजवळ, गावाजवळून जाणार्‍या महामार्गांंवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच महामार्ग व राज्य मार्गांंवरील बसथांबे प्रवाशांसाठी मृत्यूचे प्रवेशद्वार बनले आहेत. ह्यलोकमतह्ण चमूने मंगळवारी दुपारी व्याळा ते कुरणखेडपर्यंंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत शासन किती निष्काळजी आहे, हेच दिसून आले. शहरातून, गावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांंवर शेकडो ठिकाणी बसथांबे आहेत. दररोज हजारो प्रवासी बस व इतर वाहनांची वाट पाहत विविध ठिकाणच्या बसथांब्यांवर थांबतात. या थांब्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवासी उभे असतात. दरम्यान, या प्रवाशांच्या जवळून अनेक जड वाहने, ट्रॅव्हल्स, ट्रक, कंटेनरसारखी वाहने भरधाव निघून जातात. अशा वाहनांनी प्रवाशांना धडक देऊन जखमी केल्याच्या किंवा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. १६ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हय़ातील पारगाव येथे बसची वाट पाहत असलेल्या आठ प्रवाशांना एका कंटेनरने चिरडल्याने आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेसारख्याच अकोला जिल्हय़ातही अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत; परंतु या घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. तथापि. भविष्यात बसथांब्यांवरसुद्धा पारगावच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.