शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गृह अलगीकरणाच्या परवानगीसाठी रुग्णांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : संसर्गजन्य काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गृह अलगीकरणात राहावे लागते़. त्यासाठी महापालिकेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : संसर्गजन्य काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गृह अलगीकरणात राहावे लागते़. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून ‘हाेम क्वाॅरंटाईन’साठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे़. मागील काही दिवसांपासून क्षेत्रीय कार्यालयांमार्फत प्रमाणपत्र देण्यासाठी चालढकल केली जात असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना झाेन कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे़. काेराेनाबाधित रुग्णांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे़.

जिल्ह्यासह शहरात काेराेनाचा ‘डबल म्युटेड स्ट्रेन’ आढळला असून, यामध्ये १५ टक्के रुग्ण या नव्या प्रकारातील असण्याची शक्यता वैद्यकीय यंत्रणांकडून वर्तवली जात आहे़. काेराेना विषाणूच्या जनुकीय बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून, यापूर्वीच्या काेराेनाच्या तुलनेत आता काेराेनाचा वेगाने प्रसार हाेत आहे़. फेब्रुवारी महिन्यापासून महापालिका क्षेत्रात दरराेज किमान २०० काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत़. काेराेनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना किमान १४ दिवस गृह अलगीकरणात राहावे लागते़. अशा रुग्णांना गृह अलगीकरणासाठी मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे़. दरम्यान, प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णांना स्वत: झाेन कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे़, अशावेळी मनपाने रुग्णांना तातडीने प्रमाणपत्र देणे अपेक्षित असताना मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे दाखले देत चालढकल केली जात असल्याची माहिती मिळत आहे़. यामुळे अशा रुग्णांना झाेन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने काेराेनाच्या संसर्गाची शक्यता बळावली आहे़

रुग्णांची थेट मनपात धाव

गृह अलगीकरणासाठी प्रमाणपत्र देण्यात झाेन कार्यालयांकडून चालढकल केली जात असल्यामुळे काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक थेट मनपामध्ये धाव घेत आहेत़. यामुळे मनपा वर्तुळात काेराेनाच्या संक्रमणाचा धाेका वाढला आहे़.

घरांवर चिन्हं लावले, प्रमाणपत्र का नाही?

शहरात केंद्रीय पथक आढावा घेणार असल्याच्या धास्तीने मनपाच्या यंत्रणेने घाईघाईत अनेक रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे चिन्हं लावण्याची औपचारिकता निभावली़. रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच व लाल रंगाचे चिन्हं लावण्याची प्रक्रिया करतानाच संबंधितांना तातडीने प्रमाणपत्र का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़.

शहरात ९०७९ रुग्ण ‘हाेम क्वाॅरंटाईन’

महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेकडे प्राप्त अहवालानुसार १४ एप्रिलपर्यंत शहरात ९०७९ रुग्ण ‘हाेम क्वाॅरंटाईन’ आहेत़. यापैकी १,६५७ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे़. संबंधितांकडे प्रमाणपत्र आहेत का, याची प्रशासनाने शहानिशा करण्याची गरज आहे़.