शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

अकोला : पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी २५ कोटी ...

अकोला : पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये मदतीची जिल्ह्यातील तहसील कार्यालस्तरावर वितरित करण्यात आली असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, पीक नुकसानाची मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार ४५४ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यांतील ७२ हजार ४७५ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५१ कोटी ५७ लाख ४६ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतीची रक्कम डिसेंबरअखेरपर्यंत ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांची मदतीची रक्कम गत ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील महसूल यंत्रणा व्यस्त असल्याने, दहा दिवसांपूर्वी वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक नुकसानाची मदत जमा करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात येणार आहे. पीक नुकसानाची मदत खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत वाटप करण्यासाठी २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.

-संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी