शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

मदत अपुरी; वाटपाचा पेच!

By admin | Updated: January 12, 2015 01:51 IST

अकोला जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत ४0 टक्केच निधी.

संतोष येलकर/अकोलाजिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात केवळ ४0 टक्के निधी प्राप्त झाला. मागणीच्या तुलनेत मदत निधी अपुरा असल्याने, उपलब्ध निधीतून मदतीचे वाटप कोणकोणत्या गावांमधील शेतकर्‍यांना करायचे, असा पेच महसूल प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.उत्पादन बुडाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४१ पैसे आहे. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांच्या ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण राज्य शासनामार्फत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गत ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून मदत निधीचे वितरण करण्यात आले. मदत निधीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा निधी ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. प्राप्त झालेली मदत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करायची आहे; मात्र जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी १८0 कोटी २८ लाख रुपये मदतनिधीची आवश्यकता आहे. मदतीसाठी एकूण आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत ४0 टक्केच मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप कसे आणि कोण-कोणत्या गावातील शेतकर्‍यांना करायचे, असा पेच आता महसूल प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. प्राप्त झालेली मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुका स्तरावर वितरित करण्यात येणार आहे; मात्र मदतनिधी कमी असल्याने, उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात कोण-कोणत्या गावातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू करायचे, याबाबतचा गुंता जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांसमोर निर्माण झाला आहे.