शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

मदत अपुरी; वाटपाचा पेच!

By admin | Updated: January 12, 2015 01:51 IST

अकोला जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत ४0 टक्केच निधी.

संतोष येलकर/अकोलाजिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात केवळ ४0 टक्के निधी प्राप्त झाला. मागणीच्या तुलनेत मदत निधी अपुरा असल्याने, उपलब्ध निधीतून मदतीचे वाटप कोणकोणत्या गावांमधील शेतकर्‍यांना करायचे, असा पेच महसूल प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.उत्पादन बुडाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४१ पैसे आहे. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांच्या ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण राज्य शासनामार्फत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गत ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून मदत निधीचे वितरण करण्यात आले. मदत निधीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा निधी ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. प्राप्त झालेली मदत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करायची आहे; मात्र जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी १८0 कोटी २८ लाख रुपये मदतनिधीची आवश्यकता आहे. मदतीसाठी एकूण आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत ४0 टक्केच मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप कसे आणि कोण-कोणत्या गावातील शेतकर्‍यांना करायचे, असा पेच आता महसूल प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. प्राप्त झालेली मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुका स्तरावर वितरित करण्यात येणार आहे; मात्र मदतनिधी कमी असल्याने, उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात कोण-कोणत्या गावातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू करायचे, याबाबतचा गुंता जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांसमोर निर्माण झाला आहे.