शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना मदत द्या!

By admin | Updated: February 14, 2015 01:22 IST

शेतकरी जागर मंचाची जिल्हाधिका-यांकडे मागणी.

अकोला : जिल्हय़ात मंगळवारी रात्री वादळी पावसाने तडाखा दिल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाच्यावतीने शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. मंगळवार, १0 फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजताचे सुमारास वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, कांदा, तूर, ओवा या पिकांसह संत्रा, लिंबू, आंबा, पपई, डाळिंब या फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पार खचून गेला आहे. पीक हातचे गेल्यामुळे वर्षभराची गुजरान कशी करावी व शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या कच्च्या घरांची पडझड झाली आहे. महसूल व कृषी विभागाद्वारे या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान झालेल्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जागर मंचच्या पदाधिकार्‍यांनी केली.